पनवेल | आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाला पत्र देऊन पनवेल महानगरपालिकेला पाताळगंगा नदीतून घरगुती वापरासाठी वाढीव ३.६५ द.ल.घ.मी.पाणी देण्याची मागणी केली होती. त्या आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. पनवेल शहराला दररोज २८ एमएलडी पाण्याची गरज आहे.
खोपोली | लोधिवलीचा तलाठी सजाचा चार्ज, चौक किंवा तुपगाव सजाकडे देण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. लोधिवलीचा प्रभारी चार्ज दुर बसलेल्या लोहोप तलाठी यांचेकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. मौजे नढाळ, लोधिवली, सारंग, वयाळ येथील ग्रामस्थ असुन या चारही गावची तलाठी सजा स्वतंत्र अशी मौजे लोधिवली म्हणुन महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेली आहे.
कर्जत | बाप म्हणजे मुलांसाठी आधारस्तंभ असतो...मात्र कर्जत तालुक्यातील शेलू गावातील हा इसम बाप नाही साप निघाला. त्याने स्वतःच्याच सावत्र अल्पवयीन मुलीचा लचका तोडला..तोडत राहीला..धमकावत राहीला...ती मुलगी गरोदर राहीली आणि तो साप उघडा पडला. यानंतर नेरळ पोलिसांनी त्यांला बेड्या ठोकल्या आहेत.
उरण | तालुक्यातील चिरले गावातील ३५ वर्षीय नराधमाने एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उरणमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
महाड | महाड नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतींच्या इतिहासामधील सर्वात भीषण आग म्हणून इतिहासात नोंद झालेल्या महाड वसाहतीमधील ब्ल्यूजेट कंपनीतील अग्नी प्रलयास चार महिने उलटून गेल्यानंतरही शासनाकडून या संदर्भात आवश्यक असणारा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही.
अलिबाग | देशात लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघात पुरूष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने रायगडचा खासदार कोण होणार हे महिला मतदार ठरवणार आहेत.रायगड जिल्हयात २३ लाख १६ हजार ५१५ मतदार आहेत.
खोपोली | मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात मुंबईकडून पुण्याकडे जाणार्या स्कोडा कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (१५ मार्च) सायंकाळी घडली. या आगीत ही कार जळून खाक झाली आहे.सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या स्कोडा कारने अचानक पेट घेतला.
अलिबाग | लॉग इन अकाऊंट बनविण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून अलिबाग विद्यानगर येथील एकाला अज्ञात भामट्यांनी पावणेतीन लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ जानेवारी ते २७ जानेवारी यादरम्यान ही घटना घडली आहे.
अलिबाग | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील ‘राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण’ महिन्याचा ऑनलाईन शुभारंभ गुरुवारी (१४ मार्च) करण्यात आला. दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक जन्म दोष दिन पाळला जातो व मार्च महिना हा राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिना म्हणून साजरा केला जातो.
महाड । महाड तालुक्यातील विन्हेरे येथील अशोक शिवदे हे पुरामध्ये वाहून जाऊन दुर्दैवी अंत झाला होता. घरची परिस्थिती हलाखीची आहे.
नवीन पनवेल | पनवेल तालुक्यात ३ कुपोषित बालके आढळले असून ४१ मध्यम कुपोषित बालके आहेत. या कुटुंबातील गरोदर महिलांना पोषक आहार मिळत नसल्यामुळे जन्माला येणारे बाळ कमी वजनाचे असते. मूल जन्मल्यानंतरही आईचे पुरेसे दूध तसेच पोषक आहार न मिळाल्याने त्याचे कुपोषण होते. आर्थिक चणचणीमुळे आईवडिलांचे त्याकडे दुर्लक्ष होते. यातून कुपोषणाचे प्रमाण वाढत जाते.
अलिबाग | लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापुर्वी रायगड जिल्ह्यातील इंडिया आघाडीची पहिली सभा अलिबाग येथे पार पडली.
21.1k
कोर्लई । मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपेगांव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा अपघाताला आमंत्रण ठरत असून याकडे संबंधित संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबाबत पर्यटक,प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी केली जात आहे.
मुरड । खोल समुद्रात बेकायेदशीररित्या एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्या काही भैय्यानी स्थानिक मच्छिमारांना मारहाण केली.या घटनेनंतर कोळीबांधव आक्रमक झाले आहेत. ‘भैय्या हटाव, एलईडी हटाव’चा नारा देत आमच्या कुंकवाचं रक्षण करा, अशी मागणी कोळी महिलांकडून करण्यात आली आहे.
उतेखोल / माणगांव । माणगांव नगरपंचायत विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली.विशेष म्हणजे, कॉगे्रस वगळता शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट,भाजप गट, असे सर्वच राजकिय पक्षांनी गळ्यात गळे घातले आहेत.
माणगांव / रविंद्र कुवेसकर ) । अयोध्या येथील राम मंदिरात संपन्न झालेल्या प्रभू श्री रामलल्ला मुर्ति प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने माणगांव शहरात श्री राम नवमी उत्सव कमिटी आयोजीत राम रथ शोभायात्रेत माणगांवकर राम भक्तांनी जल्लोष केला. या शोभायात्रेस थेट आयोध्येवरून विशेष श्री राम मूर्ती आणण्यात आली.
रोहा | लोकसभा निवडणुकेची आचारसंहिता कधीही लागु शकते. मात्र रायगड लोकसभेच्या उमदेवारीवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील तिडा अजूनही सुटलेला नाही. त्यातच रोह्याच्या प्रवेशद्घारावरापासून जागोजागी भिंतींवर अब की फार फिर मोदी सरकार’ अश्या घोषवाक्यासह भाजपच्या कमळ ही निशाणी रेखाटण्यात आल्याचे दिसत आहे.
रोहा । दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणार्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या 30 मार्च 2024 पर्यंतच्या सर्व विस्तारित फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून केवळ गर्दीच्या हंगामात दिवा- रोहा मेमू चिपळूणपर्यंत विस्तारित केली जात असल्याने रेल्वेला रोहावासीय प्रवाशांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा । म्हसळ्यात श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला, संपूर्ण तालुक्यात श्री प्रभू रामचंद्राच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.
पाली /बेणसे । कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपुर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसर्या वर्षी अलिबाग येथील रहिवासी तर रोहा वराठी येथील बागायतदार यांना मिळाला आहे.
पेण । व्यवसायातील भागीदारामुळे पेण येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येच्या आधी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यावरुन पेण पोलीसांनी दोघाना अटक केली असून एकजण फरार झाला आहे. वाशीनाका येथे राहणारा मंदार सुरेश म्हात्रे हा तरुण संजय शंकर पाटील (काळेश्री), मोहन शिवराम म्हात्रे (भाल) आणि अविनाश म्हात्रे यांच्यासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय भागीदारीमध्ये करायचा.
पेण । पेण शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.गुरुवारी एकाच दिवसात 48 जणांना श्वानाने चावा घेतल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बल 329 जणांना कुत्रा चावल्याच्या घटनेची अधिकृत नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.
पनवेल । भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये करण्यासाठी लाच मागणार्या पनवेल तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यकला 40 हजाराची लाच घेताना नवी मुबई लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.तक्रारदार जयदास गायकर यांची गिरवले येथे स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे.
पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
पाली/बेणसे । इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर गोवा फिरायला गेलेल्या 22 तरुणीने 77 वर्षीय वृद्धाची हत्या करत त्याची गाडी आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेने पाली पोलिसांच्या मदतीने सुधागडातील परळी येथून या तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
कर्जत । 9 महिन्यांचे वेतन थकल्याने कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांनी सोमवार (11 मार्च) पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज (15 मार्च) ग्रामपंचायतीने कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा केले. कार्यालयीन कर्मचारी वगळता अन्य 87 कर्मचार्यांना एकूण 34 लाखांचे वेतन अदा करण्यात आले.
उरण | सिडकोने उरणला जोडणार्या द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी महामार्गावर जवळपास १ कोटी रुपये खर्च करून ४ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र सिडकोच्या दुर्लक्षामुळे ही रोपे पाण्याविना करपू लागली आहेत. त्यातच अज्ञात समाजकंटकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला लावलेल्या आगीत करपून गेली आहेत.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
अलिबाग । बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. तळा तालुक्यातील तारणे आदिवासीवाडी येथे केलेल्या या कारवाईत आढळलेली ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
नवीदिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपनंतर आता कॉंग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
पिंपरी । लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने दिल्लीत गौरविण्यात आले आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
मंडणगड । तालुक्यातील पन्हळी बुद्रुक येथील एका आंबा-काजूच्या बागेला अचानक आग लागल्यामुळे शेकडो झाडे जळून गेली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही मात्र सुमारे तिन लाख रुपयांचे नुकासान बागायतदार शेतकर्याचे झाले आहे.पन्हळी येथील बागायतदार सुरेश विश्राम बोथरे यांची केतकवणेचा खोडा येथे आंबा, काजूची साडे तिनशे झाडांची झाडे आहेत.
मुंबई । लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकार्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या नावांना संमती दिल्याची माहिती आहे.
मुंबई । अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना सरकारने सुरु केली. या योजनेअंर्तगत वर्षाला एक साडी महिलांना देण्यात येतेे. मात्र काही महिलांना या साड्या निर्मितीदोष आणि फाटलेल्या मिळाल्याच्या तक्रारी आल्यामुळे, तक्रार निवारणासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने एक फोन नंबर जारी केला आहे.
मुंबई । नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आज (दि.11) नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केले आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह 2019 पासून सीएए लागू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आले आहेत.