रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
पनवेल | सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी दोघा हल्लेखोरांना सुरुवातीला जवळपास एक लाख रुपये देण्यात आले होते. त्या पैशातून दोघांनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतले होते. सेंकड हँड बाइक खरेदी केली होती. तसंच, त्यातूनच रोजचा खर्च करत होते. सलमानच्या फार्महाउसचीही रेकी केली होती.
नवी मुंबई | एकीकडे उन्हाचा दाह वाढत असताना बुधवारी नवीमुंबईत बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे पहायला मिळाले. महापारेषणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात वीज गायब झाली होती. तर रायगड जिल्ह्यातील काही भागासह वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार सुरुच आहेत.
पेण | ‘नेहमीच येतो उन्हाळा, पाणी मिळविण्यासाठी धावपळ करा’ अशी वेळ पेण तालुयातील टंचाईग्रस्त गावांवर दरवर्षी येत असते. तालुयात पाणीटंचाई काही वाड्यांची व गावांची पाठ काही सोडत नाही. तालुयामध्ये कासवछाप गतीने सुरु असलेल्या जलमिशन योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही जर आदिवासी वाड्या व गावांमध्ये पाणी मिळत नसेल, तर योजना कशासाठी? असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
कर्जत | नेरळ येथील हुतात्मा चौक परिसरात फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो. त्यातील एका मोराचा वीज वाहिनीला धडक लागल्याने मृत्यू झाला. मृत झालेला पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्या पक्षावर शासकीय नियमानुसार अंतिम विधी केले जाणार आहेत.फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी परिसरात मोठ्या संख्येने मोरांचा निवास आहे.
मुंबई | सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार केला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयितांना गुजरातमधून अटक केली होती. ४८ तासांच्या आत पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना भुज येथून ताब्यात घेतलं.
महाड | संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातला आहे का? असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर केलेले भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते असा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
रोहा | सरक्षतेच्या बाबतीत नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या धाटाव एमआयडीसी तील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत शनिवारी दुपारी इलेक्ट्रिक प्लांट मध्ये कमकुवत इमारतीचा स्लॅब पडून घडलेल्या घटनेत ४ कामगार जखमी झाले असून त्यात एका कामगार गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलिबाग | रायगड जिल्ह्याचा बुधवारी काही ठिकाणी उष्मालाटेच्या झळा नागरिकांना बसल्या. तापमान ४० अंशापर्यंत गेले होते. आजदेखील (१७ एप्रिल ) हवामान विभागाने रायगडला यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात उष्मालाट उद्भवण्याची शयता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. असह्य उकाड्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
कर्जत | कर्जत पोलिसांनी जबरी चोरी व घरफोडीच्या अशा दोन गुन्ह्यातील चोरट्यांना अटक करून दोन लाख २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत, तो मूळ मालकांना केला परत आहे. जबरी चोरीचा तपास चार महिन्यात व घरफोडीचा तपास केवळ अडीच महिन्यात लावण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.
पेण | पेण तालुयातील यात्रांना रामनवमीपासून सुरुवात होत आहे. तालुयातील वाशी, वढाव, बोरी,कळवे, रावे दादर या गावांसह इतर गावांमध्ये यात्रांना सुरुवात होत असून, या यात्रांसाठी मोठी गर्दी उसळणार आहे. या यात्रांमधून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते.
पनवेल | अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करणारे दोन्ही हल्लेखोर एक महिन्यापासून पनवेल येथे वास्तव्यास होते. पनवेलमधूनच त्यांनी सदर दुचाकी विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडल्या.या घटनेनंतर बॉलीवूड जगतात खळबळ उडाली आहे.
21.1k
अलिबाग | रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (ठाकरे गट) इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभरात त्यांच्याशिवाय अन्य तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल आहेत. सोमवारी (१५ एप्रिल) रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कोर्लई | गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये अनंत गीतेेना मत म्हणजे मोदीना मत सांगत फिरणारे तेच आता मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे आता कोणासाठी मत लोकांकडे मागणार? असा सवाल शिवसेना इडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे. गेल्यावेळी शेकाप-कॉगे्रसमुळे वाचले यावेळी तटकरेंची हद्दपार करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोर्लई | अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणार्या रेल्वे भूसंपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गापासून नेण्यात यावा तसेच सातबार्यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशा मागण्या करत, ग्रामस्थांनी मो-जणीला विरोध दर्शवला आणि बुधवारी (१० एप्रिल) होणारी मोजणीची प्रक्रिया उधळवून लावली.
गोरेगांव । जिल्ह्यातील एकजण स्वतःला अघोषीत सम्राट समजतात, त्यांना वाटत आपणच मोठे राजकारणी आहोत, पण त्यांचा सातबारा फक्त रोहा तालुक्या पूरता मर्यदित आहे. या निवडणुकीत या सम्राटाचा सातबारा अनंत गीते कोरा करणार अशी घोषणाच शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे.
उतेखोल / माणगांव । माणगांव नगरपंचायत विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली.विशेष म्हणजे, कॉगे्रस वगळता शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट,भाजप गट, असे सर्वच राजकिय पक्षांनी गळ्यात गळे घातले आहेत.
रोहा | रोहा तालुक्यातील हाळ, विरजोली भागात अदानी प्रकल्पाच्या कर्मचार्यांनी बोअरवेल मारण्याच्या नावाखाली पेटवलेल्या आगीने भीषण स्वरुप घेतले. त्यामुळे हाळ, विरजोली परिसरातील वनसंपदा भस्मसात झाले आहे. अनेकांच्या फार्म हाऊसमधील आबंराई, नारळी, सुपारी, काजूच्या बागा अक्षरशः होरपळून गेल्याने एकच खळबळ उडाली.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा । म्हसळ्यात श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला, संपूर्ण तालुक्यात श्री प्रभू रामचंद्राच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.
पाली /बेणसे । कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपुर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसर्या वर्षी अलिबाग येथील रहिवासी तर रोहा वराठी येथील बागायतदार यांना मिळाला आहे.
पेण | पेण तालुक्यात बाळगंगा धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात न आल्याने प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभेसह येणार्या पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
पाली/बेणसे । इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर गोवा फिरायला गेलेल्या 22 तरुणीने 77 वर्षीय वृद्धाची हत्या करत त्याची गाडी आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेने पाली पोलिसांच्या मदतीने सुधागडातील परळी येथून या तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
खोपोली | खरसुंडीतील सेंट मेरी स्कूलच्या अतिरिक्त फी वाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना कॉलेज कक्षाच्या पदाधिकार्यांनी विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होवू नये, यासाठी बुधवारी (१० एप्रिल) खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देण्यात आले आहे.
खोपोली | खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात पावणे सतरा कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखली होती.
उरण | एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एनटीडीए) नेमण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
उरण | लोकसभा निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या आचारसंहिता काळात उरण नगरपालिकेमधील भंगार साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
नवीदिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपनंतर आता कॉंग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
नवीन पनवेल | आरबीआय बँकेमध्ये सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, एका ठकसेनने नवी मुंबईतील २६ जणांना तब्बल २ कोटी २४ लाख रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली येथे राहणारे संदीप चव्हाण याची ओळख खारघर सेक्टर दोन येथे राहणार्या सदानंद भोसले याच्याकडे झाली.