मुरुड । सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठे केलं. पण सुनील तटकरे यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, की सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे. असा निर्धार शेकापनेत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
रोहा | रोह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये दोन अनोळखी चोरट्यांनी बिघाड करून तब्बल २४ लाख५२ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली आहे. सलग ४० दिवस एटीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड करून या चोरट्यांनी इतक्या मोठ्या रक्कमेवर डल्ला मारल्याने संबधित बँक अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे .
महाड | रायगड लोकसभा मतदारसंघातून वंचित आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांच्या पत्नी कुमुदिनी चव्हाण मराठा समाजाच्या आहेत.त्यांच्याच नावाची चर्चा सुरु झाली आहे.
मुरुड । सिंचनाच्या चिखलात त्यांचा उमेेदवार रुतला आहे. गीते साहेबांकडेदेखील मोठे पद होते, त्यांनी भ्रष्टाचार नाही केला. पण, हे स्वहितासाठी काहीही करतील. त्यामुळे आज जरी ते अजित पवारांसोबत दिसत असले तरी, भाजपमध्ये जाणारे सुनील तटकरेच पहिले असतील, अशी टिका राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे.
रोहा । नागोठणे विभागातील पळससह चार गावांतील शेतकर्यांना विश्वासात न घेताच त्यांच्या शेतजमिनीमधून हायटेंशन लाईन नेण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीने सर्वेक्षण करून जमिनी परस्पर घेण्याचा घाट घातला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात या चारही गावांतील शेकडो ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
कर्जत । राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांना आमदार होण्याची घाई झाली असेल तर एकदा होऊनच जाऊ दे...जनता आणि शिवसैनिक दाखवून देईल, असा इशारा शिवसेना (शिंंदे गट) जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी दिला. राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आले होते.
नवीन पनवेल । दुचाकीस्वाराने धडक दिल्याने चंद्रकांत हनुमंतराव पटटन याचा मृत्यू झाला आहे. 25 मार्च रोजी टी पॉईंट ते कळंबोली सर्कलकडे जाणार्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या करंजाडे सनसेट पॉईंट ब्रिजजवळ काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवले आणि चंद्रकांत हनुमंतराव पटनन हा पायी चालत जात असताना त्याला पाठीमागून ठोकर मारली.
अलिबाग । राष्ट्रवादीचे युवा नेते (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आज (27 मार्च) मुरुड येथे येणार आहे. शेकापने याठिकाणी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजीत केला आहे. मुरुड तालुक्यात बुधवारी (दि.27) शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे.
खोपोली । मावळ लोकसभा निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीला गर्दीच नसल्याचे पाहून आमदार महेंद्र थोरवे संतापल्याचे दिसून आले. फक्त ठेकेदारी करू नका, पक्षसंघटना वाढविण्यासाठी काम करा. आप्पा बारणे यांना खासदार करायचे आहे, लोकसभेला मतदान कमी झाल्यास विद्यमान नगरसेवकांवर फुल्ली मारीन, असा दमच आ. थोरवे यांनी पदाधिकार्यांना दिला आहे.
मुंबई । रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी (26 मार्च) त्यांच्या नावाची घोषणा केली. तटकरे हे रायगडमधून महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रायगडमधून तटकरे विरुध्द गीते अशी पुन्हा एकदा लढत होणार आहे.
उरण | चाकरमान्यांसाठी होळी हा महत्वाचा सण आहे. कोकणातील गावोगावी ‘शिमगा’ उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या सणासाठी मुंबई, नवी मुंबईतील चाकरमानी हमखास गावी दाखल होतात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी उरण एसटी आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
21.1k
अलिबाग | मुरुड नगर परिषदेचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची धुरा समर्थपणे सांभाळणारे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रमोद भायदे यांची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मुरुड येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उतेखोल / माणगांव । माणगांव नगरपंचायत विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली.विशेष म्हणजे, कॉगे्रस वगळता शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट,भाजप गट, असे सर्वच राजकिय पक्षांनी गळ्यात गळे घातले आहेत.
माणगांव / रविंद्र कुवेसकर ) । अयोध्या येथील राम मंदिरात संपन्न झालेल्या प्रभू श्री रामलल्ला मुर्ति प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने माणगांव शहरात श्री राम नवमी उत्सव कमिटी आयोजीत राम रथ शोभायात्रेत माणगांवकर राम भक्तांनी जल्लोष केला. या शोभायात्रेस थेट आयोध्येवरून विशेष श्री राम मूर्ती आणण्यात आली.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा । म्हसळ्यात श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला, संपूर्ण तालुक्यात श्री प्रभू रामचंद्राच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.
पाली /बेणसे । कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपुर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसर्या वर्षी अलिबाग येथील रहिवासी तर रोहा वराठी येथील बागायतदार यांना मिळाला आहे.
पेण । व्यवसायातील भागीदारामुळे पेण येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येच्या आधी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यावरुन पेण पोलीसांनी दोघाना अटक केली असून एकजण फरार झाला आहे. वाशीनाका येथे राहणारा मंदार सुरेश म्हात्रे हा तरुण संजय शंकर पाटील (काळेश्री), मोहन शिवराम म्हात्रे (भाल) आणि अविनाश म्हात्रे यांच्यासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय भागीदारीमध्ये करायचा.
पेण । पेण शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.गुरुवारी एकाच दिवसात 48 जणांना श्वानाने चावा घेतल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बल 329 जणांना कुत्रा चावल्याच्या घटनेची अधिकृत नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.
पनवेल | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पोर्शवभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये ‘मिशन ऑल आऊट’ राबविले. यामुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. मिशन ऑल आऊट मोहिमेमध्ये आझाद नगर झोपडपट्टी येथून राजू दास या याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास १ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
पाली/बेणसे । इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर गोवा फिरायला गेलेल्या 22 तरुणीने 77 वर्षीय वृद्धाची हत्या करत त्याची गाडी आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेने पाली पोलिसांच्या मदतीने सुधागडातील परळी येथून या तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघात आम्ही आपले आयुष्य शिवसैनिक म्हणुन कार्य केले.मात्र मागील चार पाच वर्षे या मतदारसंघात महिला शिवसैनिक यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण आपल्या सहकार्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करीत आहे असे सुरेखा खेडेकर यांची स्पष्ट केले.
खोपोली | मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज खामगाव-बुलढाणा ही बस रायगडकडे जात असताना तिचा शिळफाटा मिळगावजवळ अपघात झाला. या अपघातात बस मधील एकाचा जागीच मृत्यू झाला. ४५ विद्यार्थी आणि शिक्षक सुखरूप आहेत.
उरण | अटल सेतूवर रविवारी पहिल्या आत्महत्येची नोंद झाली. टॅक्सीने सेतूवर येऊन किंजल शहा (४३) या महिलेने समुद्रात उडी टाकली. न्हावा शेवा पोलीस त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. किंजल शहा या डॉक्टर होत्या. परंतु त्या गेल्या दहा वर्षांपासून नैराश्याच्या गर्तेत सापडल्या होत्या. नैराश्यातून किंजल यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.
महाड | महाड पंचायत समिती च्या जुन्या इमारतीला बांधून ५० वर्षे झाली असून या इमारतीचा वापर बंद करून ५ ते ६ वर्षे होऊनही ही इमारत आजही धोकादायक अवस्थेत उभी आहे.या इमारतीच्या परिसरात तालुक्यातील जनतेचा दररोज मोठ्या संख्येने वावर असतो. त्यामुळे जर दिवसा ही इमारत अचानक कोसळली तर नाहक जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
अलिबाग । बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. तळा तालुक्यातील तारणे आदिवासीवाडी येथे केलेल्या या कारवाईत आढळलेली ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
नवीदिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपनंतर आता कॉंग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
मंडणगड । तालुक्यातील पन्हळी बुद्रुक येथील एका आंबा-काजूच्या बागेला अचानक आग लागल्यामुळे शेकडो झाडे जळून गेली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही मात्र सुमारे तिन लाख रुपयांचे नुकासान बागायतदार शेतकर्याचे झाले आहे.पन्हळी येथील बागायतदार सुरेश विश्राम बोथरे यांची केतकवणेचा खोडा येथे आंबा, काजूची साडे तिनशे झाडांची झाडे आहेत.
नवीन पनवेल | पनवेल शहर पोलिसांनी अटक केलेला राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर २२ मार्च रोजी सुनावणी झाली. पनवेल न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राहुल पाटीलचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
मुंबई | महाराष्ट्र राज्याचे माजी आठवे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्य मंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या तिथेच त्यांची आज रात्री ११ वाजता प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर आंबेत या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.