अलिबाग | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
पोलादपूर | तालुयातील माताबाल पोषण आहार गेल्या चार महिन्यांपासून रखडला असून लोकसभा निवडणुकीनंतरच पोषण आहाराचे वाटप होईल, अशी माहिती पोलादपूर शहरातील तसेच तालुयातील अंगणवाडयांतून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची नांवे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दोन वेबसाईटसच्या नादुरूस्तीची चर्चा झाली आहे.
अलिबाग | कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शयता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे.
माणगाव | माणगाव येथील एक महिलेने तिच्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.
पनवेल | बाप निघाला हैवान, अल्पवयीन सावत्र मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना खारघर येथे घडली. वकिल असलेल्या या नराधमाची काळेकृत्ये मुलीच्या शिक्षिकेने समोर आणली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा गुरुवारी जाहीर करण्यात आला. या वचननाम्यात महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ असे वचन देण्यात शिवसेनेने दिले आहे. तसेच तरुणांना रोजगार, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर लूट थांबवू, शेतकर्यांना कर्जमुक्त करणार, जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करणार अशी आश्वासनं देण्यात आली आहेत.
म्हसळा | शेकापक्षाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनीच केल्याचा आरोप रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे शेकापचे लोकसभा निवडणुकीतून नामोनिशाण संपुष्टात आले.
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात २६ एप्रिलला होणार्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.
पेण | उन्हाळाचा पारा वाढत आहे.रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ४० ते ४३ दरम्यान जात आहे. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागत आहेत. यामुळे आपसूकच पावले रस्त्याच्याकडेला असलेल्या रसवंती गृह,ज्यूस सेंटर तसेच लिंबू सरबतच्या हात गाड्या आणि टपर्यांकडे वळतात.
अलिबाग | दोघांमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना अलिबाग तालुयातील बुरुमखाण आदिवासीवाडी येथे घडली. अजय संतोष वाघमारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.असल्याबाबतची तक्रार अर्चना अजय वाघमारे (वय २४ वर्षे) हीने अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
अलिबाग | रायगड लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांचे शंभर टक्के मतदान होण्यासाठी दिव्यांग मतदार आयकॉन तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांनी संकल्प केला आहे.जिल्हाधिकरी कार्यालयात जिल्हाधिकरी किशन जावळे यांची साईनाथ पवार यांनी भेट घेतली.
माणगाव | सुनील तटकरेंना मंत्री केले, मुलीला मंत्री केले. एका कुटूंबात पाच पदे दिली; मात्र त्यांनी शरद पवार यांना फसवले. शरद पवार यांचे घर फोडण्याचे काम सुनील तटकरे यांनीच केल्याचा आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बॅ.अंतुलेंनाही त्यांनीच फसवले आणि आता ते जावयाला घेऊन फिरत असल्याचेही म्हणाले.रायगड लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा मंगळवारी (२३ एप्रिल) मोर्बा येथे पार पडली.
21.1k
कोर्लई | गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये अनंत गीतेेना मत म्हणजे मोदीना मत सांगत फिरणारे तेच आता मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे आता कोणासाठी मत लोकांकडे मागणार? असा सवाल शिवसेना इडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे. गेल्यावेळी शेकाप-कॉगे्रसमुळे वाचले यावेळी तटकरेंची हद्दपार करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोर्लई | अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणार्या रेल्वे भूसंपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गापासून नेण्यात यावा तसेच सातबार्यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशा मागण्या करत, ग्रामस्थांनी मो-जणीला विरोध दर्शवला आणि बुधवारी (१० एप्रिल) होणारी मोजणीची प्रक्रिया उधळवून लावली.
धाटाव/ रोहा | रोहे तालुयातील धाटाव एमआयडीसीतील सामुदायिक जलशुद्धीकेंद्राजवळ रविवारी (२१ एप्रिल) भीषण आग लागली. आगीत जलशुद्धीकरण केंद्र निकामी झाले आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाले असून, या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
रोहा | सरक्षतेच्या बाबतीत नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या धाटाव एमआयडीसी तील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत शनिवारी दुपारी इलेक्ट्रिक प्लांट मध्ये कमकुवत इमारतीचा स्लॅब पडून घडलेल्या घटनेत ४ कामगार जखमी झाले असून त्यात एका कामगार गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा | १२ वर्षांपूर्वी म्हसळा तालुका टँकरमुक्त झाला. सद्यस्थितीत मात्र म्हसळा शहरातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. गेल्या ३० वर्षांत जिल्हा परिषद ग्रामीण पााणीपुरवठा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन अशा सर्व सुमारे १०० कोटींच्या योजना होऊनही म्हसळा शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पेण | पेणमध्ये चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून १ किलो चरस जप्त करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषणला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
पनवेल | सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी दोघा हल्लेखोरांना सुरुवातीला जवळपास एक लाख रुपये देण्यात आले होते. त्या पैशातून दोघांनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतले होते. सेंकड हँड बाइक खरेदी केली होती. तसंच, त्यातूनच रोजचा खर्च करत होते. सलमानच्या फार्महाउसचीही रेकी केली होती.
पाली /बेणसे | लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि मौलिक अधिकार आहे. त्यामुळे मत विकू नका, आता काहीजण पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील, असे सांगत ‘गाढवाची किंमत ६० हजार, माणसाची किंमत किती, तर फक्त २००० रुपये का? असा सवाल उपस्थित करत, इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी गाढवाची भन्नाट गोष्ट सांगितली.
पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
कर्जत | देशात लोकसभा निवडणुका सुरू असून सर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. याचाच गैरफायदा घेत, कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु आहे. जमिनी सपाटीकरण करण्याच्या नावाखाली हे सर्व सुरु आहे.कर्जत तालुका मोठ्या प्रमाणात जंगल असलेला तालुका म्हणून ओळखला जायचा.
मुंबई | सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार केला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयितांना गुजरातमधून अटक केली होती. ४८ तासांच्या आत पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना भुज येथून ताब्यात घेतलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सत्ता पाहिली! श्रीरंग बारणे यांची उद्धव ठाकरेंवर टिका
खोपोली | मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे,शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार रोहित पवार, शिवसेना उप- नेते सचिन अहिर या प्रमुख नेत्यांची उपस्थित होती.
उरण | एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एनटीडीए) नेमण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
उरण | लोकसभा निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या आचारसंहिता काळात उरण नगरपालिकेमधील भंगार साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
महाड | संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातला आहे का? असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर केलेले भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते असा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
पिंपरी- चिंचवड | बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
नवी मुंबई | एकीकडे उन्हाचा दाह वाढत असताना बुधवारी नवीमुंबईत बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे पहायला मिळाले. महापारेषणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात वीज गायब झाली होती. तर रायगड जिल्ह्यातील काही भागासह वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार सुरुच आहेत.