म्हसळा | १२ वर्षांपूर्वी म्हसळा तालुका टँकरमुक्त झाला. सद्यस्थितीत मात्र म्हसळा शहरातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. गेल्या ३० वर्षांत जिल्हा परिषद ग्रामीण पााणीपुरवठा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन अशा सर्व सुमारे १०० कोटींच्या योजना होऊनही म्हसळा शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माणगाव | माणगाव तालुयात शासनाने १५३ जलजीवन मिशन योजनेची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ७७ कामे पूर्ण झाली असून, ७६ कामे प्रगतीपथावर आहेत. ती २०२५ पर्यंत पूर्ण होतील, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन योजना राबविली जात असली तरी माणगाव तालुका हा जलजीवन योजनेच्या कामात जिल्ह्यात अग्रेसर दिसत आहे.
कर्जत | देशात लोकसभा निवडणुका सुरू असून सर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. याचाच गैरफायदा घेत, कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु आहे. जमिनी सपाटीकरण करण्याच्या नावाखाली हे सर्व सुरु आहे.कर्जत तालुका मोठ्या प्रमाणात जंगल असलेला तालुका म्हणून ओळखला जायचा.
खोपोली | मुंबई-पुणे एस्प्रेस वेवरुन लग्नाचे वर्हाड घेऊन निघालेल्या बसला खोपोलीजवळ भीषण आग लागली. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमधून सुमारे ४२ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
धाटाव/ रोहा | रोहे तालुयातील धाटाव एमआयडीसीतील सामुदायिक जलशुद्धीकेंद्राजवळ रविवारी (२१ एप्रिल) भीषण आग लागली. आगीत जलशुद्धीकरण केंद्र निकामी झाले आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाले असून, या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
अलिबाग | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले आज राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून इंडिया आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे आज (२२ एप्रिल) मुंबईतील गरवारे लबमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
पिंपरी- चिंचवड | बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.
रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
पनवेल | सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी दोघा हल्लेखोरांना सुरुवातीला जवळपास एक लाख रुपये देण्यात आले होते. त्या पैशातून दोघांनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतले होते. सेंकड हँड बाइक खरेदी केली होती. तसंच, त्यातूनच रोजचा खर्च करत होते. सलमानच्या फार्महाउसचीही रेकी केली होती.
नवी मुंबई | एकीकडे उन्हाचा दाह वाढत असताना बुधवारी नवीमुंबईत बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे पहायला मिळाले. महापारेषणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात वीज गायब झाली होती. तर रायगड जिल्ह्यातील काही भागासह वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार सुरुच आहेत.
पेण | ‘नेहमीच येतो उन्हाळा, पाणी मिळविण्यासाठी धावपळ करा’ अशी वेळ पेण तालुयातील टंचाईग्रस्त गावांवर दरवर्षी येत असते. तालुयात पाणीटंचाई काही वाड्यांची व गावांची पाठ काही सोडत नाही. तालुयामध्ये कासवछाप गतीने सुरु असलेल्या जलमिशन योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही जर आदिवासी वाड्या व गावांमध्ये पाणी मिळत नसेल, तर योजना कशासाठी? असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
कर्जत | नेरळ येथील हुतात्मा चौक परिसरात फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो. त्यातील एका मोराचा वीज वाहिनीला धडक लागल्याने मृत्यू झाला. मृत झालेला पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्या पक्षावर शासकीय नियमानुसार अंतिम विधी केले जाणार आहेत.फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी परिसरात मोठ्या संख्येने मोरांचा निवास आहे.
21.1k
अलिबाग | रायगड जिल्ह्याचा बुधवारी काही ठिकाणी उष्मालाटेच्या झळा नागरिकांना बसल्या. तापमान ४० अंशापर्यंत गेले होते. आजदेखील (१७ एप्रिल ) हवामान विभागाने रायगडला यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात उष्मालाट उद्भवण्याची शयता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. असह्य उकाड्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
कोर्लई | गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये अनंत गीतेेना मत म्हणजे मोदीना मत सांगत फिरणारे तेच आता मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे आता कोणासाठी मत लोकांकडे मागणार? असा सवाल शिवसेना इडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे. गेल्यावेळी शेकाप-कॉगे्रसमुळे वाचले यावेळी तटकरेंची हद्दपार करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोर्लई | अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणार्या रेल्वे भूसंपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गापासून नेण्यात यावा तसेच सातबार्यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशा मागण्या करत, ग्रामस्थांनी मो-जणीला विरोध दर्शवला आणि बुधवारी (१० एप्रिल) होणारी मोजणीची प्रक्रिया उधळवून लावली.
गोरेगांव । जिल्ह्यातील एकजण स्वतःला अघोषीत सम्राट समजतात, त्यांना वाटत आपणच मोठे राजकारणी आहोत, पण त्यांचा सातबारा फक्त रोहा तालुक्या पूरता मर्यदित आहे. या निवडणुकीत या सम्राटाचा सातबारा अनंत गीते कोरा करणार अशी घोषणाच शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे.
रोहा | सरक्षतेच्या बाबतीत नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या धाटाव एमआयडीसी तील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत शनिवारी दुपारी इलेक्ट्रिक प्लांट मध्ये कमकुवत इमारतीचा स्लॅब पडून घडलेल्या घटनेत ४ कामगार जखमी झाले असून त्यात एका कामगार गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा । म्हसळ्यात श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला, संपूर्ण तालुक्यात श्री प्रभू रामचंद्राच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.
पेण | पेण तालुयातील यात्रांना रामनवमीपासून सुरुवात होत आहे. तालुयातील वाशी, वढाव, बोरी,कळवे, रावे दादर या गावांसह इतर गावांमध्ये यात्रांना सुरुवात होत असून, या यात्रांसाठी मोठी गर्दी उसळणार आहे. या यात्रांमधून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते.
पेण | पेण तालुक्यात बाळगंगा धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात न आल्याने प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभेसह येणार्या पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
पनवेल | अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करणारे दोन्ही हल्लेखोर एक महिन्यापासून पनवेल येथे वास्तव्यास होते. पनवेलमधूनच त्यांनी सदर दुचाकी विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडल्या.या घटनेनंतर बॉलीवूड जगतात खळबळ उडाली आहे.
पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
पाली/बेणसे । इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर गोवा फिरायला गेलेल्या 22 तरुणीने 77 वर्षीय वृद्धाची हत्या करत त्याची गाडी आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेने पाली पोलिसांच्या मदतीने सुधागडातील परळी येथून या तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
मुंबई | सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार केला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयितांना गुजरातमधून अटक केली होती. ४८ तासांच्या आत पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना भुज येथून ताब्यात घेतलं.
खोपोली | खरसुंडीतील सेंट मेरी स्कूलच्या अतिरिक्त फी वाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना कॉलेज कक्षाच्या पदाधिकार्यांनी विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होवू नये, यासाठी बुधवारी (१० एप्रिल) खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देण्यात आले आहे.
उरण | एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एनटीडीए) नेमण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
उरण | लोकसभा निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या आचारसंहिता काळात उरण नगरपालिकेमधील भंगार साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
महाड | संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातला आहे का? असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर केलेले भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते असा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
नवीन पनवेल | आरबीआय बँकेमध्ये सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, एका ठकसेनने नवी मुंबईतील २६ जणांना तब्बल २ कोटी २४ लाख रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली येथे राहणारे संदीप चव्हाण याची ओळख खारघर सेक्टर दोन येथे राहणार्या सदानंद भोसले याच्याकडे झाली.