उरण | केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्पापूर्वी राज्यातील शेतकर्यांना गिफ्ट दिले होते. चार महिने २७ दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवली.४० टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली. परंतु त्यानंतर अडचणी काही सुटत नाही.निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन चार दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे कांद्याचे ४०० कंटनेर बंदरावरच अडकले. त्याचा फटका व्यापार्यांना बसत आहे.
पनवेल | काही दिवस वापरण्यासाठी दिलेली कार परस्पर गहाण ठेवून, तिचा अपहार केल्याची घटना पनवेल तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात वाल्मीक गोपाळ यांच्या तक्रारीवरुन, कमलेश वरसाळे याच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड | मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतू दुसर्या बाजूला सदोष मतदार यादीचा फटका अनेक मतदारांना बसला. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पहायला मिळाल्या.
अलिबाग | महिलेला दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने बालात्कार केल्याप्रकरणी दोघांना अलिबाग येथील सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांनी प्रत्येकी १० वर्षे कैद आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेश लहानू नाईक व विशाल कृष्णा म्हात्रे अशी दोघांची नावे आहेत.
अलिबाग | रेवदंडा येथील एका मतदान केंद्रावर मतदान करताना स्वतःचे व्हिडीओ शुटींग करुन स्टेटस ठेवणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान घेण्यात आले.
अलिबाग | रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान घेण्यात आली. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या तारखेकडे लागले आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे विरुध्द अनंत गीते अशी प्रमुख लढत आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघात ६०.५१ टक्के इतके मतदान झाले आहे.
मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.
कर्जत | कर्जत तालुयातील शिंगढोळ येथील सूरज नारायण भालिवडे (३४) हा युवक दुचाकीवरूनजात असता मागून येणार्या टँकरने धडक दिली व सुमारे पंचवीस फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे येथील सुसगावमधील शिवबा चौकात घडली.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली | मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील जमिनीवरील उमेदवार असल्याने दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता वाढू लागली आहे.विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असताना खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांनी वाघेरे यांना जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीच्या बैठकी दरम्यान दिला आहे.
पनवेल | थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जेष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांनी त्यांच्या पवीत्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगतसाहेबा
खोपोली | मीळ गावाशेजारील डम्पिंग ग्राऊंडला सोमवारी, ६ मे रोजी रात्रीच्या दरम्यान आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रयत्न केला. प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी यंत्रणा उभी न केल्याने दुसर्या दिवशीही आग घुमसत होती.
पेण | ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान करण्यास सुरुवात झाली; परंतु पेण तालुयातील बाळगंगा धरण प्रकल्पातील ६ ग्रामपंचायतीतील ९ गावे, १३ आदिवासी वाड्यांतील मतदारांनी मतदान केले नाही. या भागातील तब्बल १० हजार मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
21.1k
कोर्लई / मुरुड | आज उद्योग धंदे गुजरातला पळवत आहेत, उद्या महाराष्ट्राचे मंत्रायल सुद्धा पळवायला मागे पुढे पाहणार नाही अशी तोफ शिवसेना युवा नेते (ठाकरे गट) अदित्य ठाकरे भाजपवर डागली. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा घास घेऊन गुजरातला देणार असतील तर मी आडवा येणारच असही त्यांनी यावेळी ठणकावले आहे.
मुरुड | फणसाड अभयारण्यात पक्षी व वन्यजीवाची तहान भागवण्यासाठी ८ नवीन बशी तलाव निर्माण करण्यात आले आहेत. अभयारण्यात नैसर्गिक २७ पाण्याची स्रोत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध होणार आहे.फणसाड अभयारण्यात नुकतेच रानगवे सुद्धा आढळून आलेले आहेत.
माणगाव | ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निजामपूर ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा गेले महिनाभरापासून कमी प्रमाणात सोडले जात असून अनेक वेळा कधी तांत्रिक बिघाड तर कधी पाणीपुरवठा करणार्या विहिरीत पाणी नसल्याने निजामपूरकरांना निमूटपणे पाणीटंचाईचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निजामपुरात जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून बोलताना व्यक्त होत आहे.
माणगाव | शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरदरम्यान त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची. महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी हा हल्ला केल्याचा आरोप नवगणे यांनी केला आहे.
रोहा | शिवसेना (शिंदे गट) रोहा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष उस्मान रोहेकर यांनी आपल्याापदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. वेळ आल्यावर धमाका करू असेही रोहेकर यांनी म्हटले आहे.
धाटाव/ रोहा | रोहे तालुयातील धाटाव एमआयडीसीतील सामुदायिक जलशुद्धीकेंद्राजवळ रविवारी (२१ एप्रिल) भीषण आग लागली. आगीत जलशुद्धीकरण केंद्र निकामी झाले आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाले असून, या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा | शेकापक्षाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनीच केल्याचा आरोप रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे शेकापचे लोकसभा निवडणुकीतून नामोनिशाण संपुष्टात आले.
म्हसळा | १२ वर्षांपूर्वी म्हसळा तालुका टँकरमुक्त झाला. सद्यस्थितीत मात्र म्हसळा शहरातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. गेल्या ३० वर्षांत जिल्हा परिषद ग्रामीण पााणीपुरवठा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन अशा सर्व सुमारे १०० कोटींच्या योजना होऊनही म्हसळा शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पेण | रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होणार आहे. निवडणुक लोकसभेची असली तरी या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार-सहा महिन्यांनंतर होणार्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
पाली/बेणसे | मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, जिल्हा महासचिव वैभव केदारी, जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदा ताई बनसोडे, रामदास भगत, पँथर सुशील भाई जाधव यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.
पाली /बेणसे | लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि मौलिक अधिकार आहे. त्यामुळे मत विकू नका, आता काहीजण पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील, असे सांगत ‘गाढवाची किंमत ६० हजार, माणसाची किंमत किती, तर फक्त २००० रुपये का? असा सवाल उपस्थित करत, इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी गाढवाची भन्नाट गोष्ट सांगितली.
कर्जत | कर्जत तालुक्यील गुंडगे गावालगत असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न बिकट बनला आहे. मोर्चा, मागण्या, विनवण्या करुनही हे डंम्पिंग ग्राऊंड हलविण्यात न आल्याने, गुंडगे गावासह पंचशील नगर, संत रोहिदास नगर परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
खोपोली | शेतकरी कामगार पक्ष जो विचार घेऊन रायगड जिल्ह्यात ७५ वर्षे काम करतोय,तो कोणीही संपवू शकत नाही. अनेक नेते आले आणि गेले, सत्ता येते...जाते; पण विचार कधी संपत नाहीत. शेकापक्ष संपला असे ते म्हणत असतील तर कशाला शेकापची चिंता करता? असा टोला आ. जयंत पाटील यांनी तटकरे यांना लगावला आहे.लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आ.जयंत पाटील यांनी खालापूरात पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
उरण | एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एनटीडीए) नेमण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
महाड । महाडमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रकाश चिनकाटे असे या मतदाराचे नाव असून, दाभेकर कोंड येथील मतदान केंद्राबाहेर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पोलादपूर | तालुक्यातील महालगूर येथील एका वृध्देच्या हातातील 2 सोन्याच्या बांगडया अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये घडली असून याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलादपूर | तालुयातील माताबाल पोषण आहार गेल्या चार महिन्यांपासून रखडला असून लोकसभा निवडणुकीनंतरच पोषण आहाराचे वाटप होईल, अशी माहिती पोलादपूर शहरातील तसेच तालुयातील अंगणवाडयांतून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची नांवे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दोन वेबसाईटसच्या नादुरूस्तीची चर्चा झाली आहे.
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
नवी दिल्ली | हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा किंवा जेवणाचा दारू पिण्याचा कार्यक्रम नाही. त्याची पवित्रता लक्षात घेणे गरजेचे आहे. फक्त रजिस्ट्रेशन केल्याने लग्न वैध होत नाही. विवाह पूर्ण होण्यासाठी मंत्रोच्चार व सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी- चिंचवड | बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी | लोकसभा निवडणूकीपुर्वी वाद शमतोय असे दिसत असताना,रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा वाद पहायला मिळत आहे. या दोघा भावांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.या वादामुळे कोकणातील राजकारण चांगले तापले आहे.
रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
पनवेल | पार्टनरशिपच्या वादातून हॉस्पिटलमध्ये घुसून डॉटरला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. यासंदर्भात मॅट्रिकस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. नंदगोपाळ आचारी यांच्या तक्रारीवरुन तीन जणांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन पनवेल | पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह समोर वाहनतळाचे काम सुरु असून, याठिकाणी गुरुवारी (२ मे) भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे.पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील सरस्वती विद्यामंदिर शाळा पाडून त्या ठिकाणी वाहनतळाचे काम सुरु आहे.शहरातील फडके नाट्यगृहासमोर वाहनतळाचे काम सुरु आहे.