उरण | लोकसभा निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या आचारसंहिता काळात उरण नगरपालिकेमधील भंगार साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
पनवेल | पलावा येथील कंपनीतून नावडे येथे घरी परतणार्या तरुणाच्या स्कूटीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तळोजा पोलिसांनी या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
नवी मुंबई | नवी मुंबई शहरात सकाळपासून स्वागतयात्रा निघत होत्या. मात्र मोठ्या आणि प्रमुख समजल्या जाणार्या शोभायात्रा सकाळी साडेदहानंतर निघाल्या. ढोल ताशांच्या गजरात विविध पारंपरिक वेशभूषा करत निघालेल्या शोभायात्रेत मतदान करा असा संदेशही देण्यात आला.
पेण | ग्रामीण भागासह शहरी भागात क्रिकेचा फिव्हर सध्या तरुणाईवर चढला आहे. आयपीएल क्रिकेट सुरू झाल्यापासून क्रिकेटची क्रेझ अजूनच वाढली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळला जात असताना आता ग्रामीण भागातही टेनिस क्रिकेटचे सामने ठिकठिकाणी भरवले जात आहेत.
कर्जत । कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. या मिरची बाजाराला शंभर वर्षे होत आली आहेत. गेल्या वर्षी ग्राहकांना मिरचीचा जोरदार ठसका बसला होता.
बोर्लीपंचतन । मिरज-श्रीवर्धन एस.टी. बसचा गोंडघर गावाजवळ अपघात झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. एसटमध्ये यावेळी 34 प्रवासी होते. सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.श्रीवर्धन आगाराची एसटी मिरजहून श्रीवर्धनकडे येत असताना गोंडघर गावानजीक गाडीचा पाटा तुटला.
अलिबाग | रायगड जिल्हाभरात मंगळवारी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील लहानमोठ्या शहरांमध्ये ढोल ताशाच्या गजरात शोभा यात्रा काढण्यात आल्या. मराठमोळा पारंपारिक पोषाख परिधान करुन मराठजन या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले.अलिबाग, पेण, पनवेल, महाड,कर्जत, रोह्यासह विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली.
मुंबई | मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसेच्या राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसून सर्व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीचं काम करावं अशा सूचना दिल्या.
मुरुड जंजिरा | शाळांना सुटट्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक सहकुटूंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. पर्यटकांसाठी अलिबागसह मुरुड-जंजिरा आवडते ठिकाण आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये येणार्या पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरुड जंजिरा सज्ज झाला आहे.
अलिबाग | दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही. मला बोलायला भाग पाडू नका. आदरणीय शरद पवार यांची साथ सोडली. त्याचप्रमाणे अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? असा प्रश्न रोहित पवार यांनी रायगड लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विचारला आहे.
खोपोली | खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात पावणे सतरा कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखली होती.
महाड | महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू डेपोमधील डंपरने एका वृद्ध ग्रामस्थाला चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. महाड पोलीसांनी डंपर चालक सज्जाद समद पठाण याला अटक केली आहे.मुठवली गावचे वयस्कर शेतकरी रामचंद्र तुकाराम डावरुंग हे सोमवारी (८ एप्रिल) सकाळी आपल्या गुरांसाठी विहिरीवरून पाणी घेण्यासाठी गेले असता, डंपर चालक सज्जाद पठाण याने त्यांना गाडीखाली चिरडले.
21.1k
गोरेगांव । जिल्ह्यातील एकजण स्वतःला अघोषीत सम्राट समजतात, त्यांना वाटत आपणच मोठे राजकारणी आहोत, पण त्यांचा सातबारा फक्त रोहा तालुक्या पूरता मर्यदित आहे. या निवडणुकीत या सम्राटाचा सातबारा अनंत गीते कोरा करणार अशी घोषणाच शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे.
उतेखोल / माणगांव । माणगांव नगरपंचायत विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली.विशेष म्हणजे, कॉगे्रस वगळता शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट,भाजप गट, असे सर्वच राजकिय पक्षांनी गळ्यात गळे घातले आहेत.
रोहा | मुंबई-गोवा महामार्गावर एका सेलेरीयो कारला भरधार टे्रलरने जोरदार धडक दिली. या अपघातात रोहा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
रोहा । राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी शेकापचा मुरुड तालुक्यातील एक मोठा नेता फोडल्यानंतर मंगळवारी त्यांनी आणखी एक धक्का शेकाप नेते जयंत पाटील यांना दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, शेकापचे पदाधिकारी नंदू म्हात्रे यांना त्यांच्या गळाला लावले आहे. म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे शेकापला जोरदार झटका बसला आहे.
रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा
श्रीवर्धन । दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
म्हसळा । म्हसळ्यात श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला, संपूर्ण तालुक्यात श्री प्रभू रामचंद्राच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.
पाली /बेणसे । कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपुर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसर्या वर्षी अलिबाग येथील रहिवासी तर रोहा वराठी येथील बागायतदार यांना मिळाला आहे.
पेण । व्यवसायातील भागीदारामुळे पेण येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येच्या आधी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यावरुन पेण पोलीसांनी दोघाना अटक केली असून एकजण फरार झाला आहे. वाशीनाका येथे राहणारा मंदार सुरेश म्हात्रे हा तरुण संजय शंकर पाटील (काळेश्री), मोहन शिवराम म्हात्रे (भाल) आणि अविनाश म्हात्रे यांच्यासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय भागीदारीमध्ये करायचा.
पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
पाली/बेणसे । इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर गोवा फिरायला गेलेल्या 22 तरुणीने 77 वर्षीय वृद्धाची हत्या करत त्याची गाडी आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेने पाली पोलिसांच्या मदतीने सुधागडातील परळी येथून या तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
ई रिक्षा ठेकेदाराकडून माथेरानकरांची लूट ; अडिच किलोमीटरसाठी आकारले जाते ३५ रुपये भाडे|
खोपोली | जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चौक गावच्या हॉटेल तेजस मालवणी मेजवानी जवळच एका रिकाम्या डंपरला आग लागली. डंपरची केबिन जळून खाक झाली.
उरण | आधी कांदा निर्यात शुल्कात केलेली वाढ, त्यानंतर चार महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी याचा जेएनपीए बंदरालाही बसला आहे. या बंदरातून महिन्याकाठी सुमारे ४ हजार कंटेनर कार्गोमधून होणारी १ लाख टन कांद्याची निर्यात शून्यावर आली आहे.
महाड | महाडचे आमदार भरत गोगावलेंच्या दहशतीला कंटाळून आपण आपल्या कुटुंबासह ६ जून २०२४ रोजी आमदारांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
नवीदिल्ली । काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या लेटरबॉम्बमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
नवीदिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपनंतर आता कॉंग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय.
रत्नागिरी । माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी )ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) ची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधित होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
मंडणगड । तालुक्यातील पन्हळी बुद्रुक येथील एका आंबा-काजूच्या बागेला अचानक आग लागल्यामुळे शेकडो झाडे जळून गेली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही मात्र सुमारे तिन लाख रुपयांचे नुकासान बागायतदार शेतकर्याचे झाले आहे.पन्हळी येथील बागायतदार सुरेश विश्राम बोथरे यांची केतकवणेचा खोडा येथे आंबा, काजूची साडे तिनशे झाडांची झाडे आहेत.
मुंंबई | मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश मला दिल्लीतून आले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले होते. ठाकरे सरकारमधल्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणे ही त्यावेळची गरज होती. तसे केले नसते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजपा संपवली असती, विरोधकांना संपवले असते, तुरुंगात टाकलं असतं असा खुलासा भाजपचे नेते इडी फेम किरीट सोमय्या यांनी केला आहे.
नवीन पनवेल | कळंबोली सर्कल येथून पनवेल कडे जाणार्या रस्त्यावर मोटरसायकल डिव्हायडरला धडकल्याने यात प्रवीण तानू पळसमकर( राहणार ,कोळीवाडा घणसोली) मृत्यू झाला. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली.