महाड | यावेळची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक असून ज्या ‘मिंधे सरकार’ने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले, ते उद्योग पुन्हा आणून रोजगारनिर्मिती करण्यासाठी परिवर्तन करा, असे आवाहन शिवसेनेचे युवानेते युवा सेनेचे प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी महाडच्या सभेतून केले.
उरण | लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
खारी/ रोहा | महाराष्ट्र औद्योगिक वसाहती धाटाव औद्योगिक क्षेत्रांमधील कारखान्यांचे सामाईक प्रक्रिया केंद्राद्वारे राजरोसपणे विसर्ग करण्यात आलेलया प्रदूषित पाण्याने डावा तीर कुंडलिका नदी पात्रातील जिवंतमासे मृत्यूमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले आहेत. शिवाय प्रदूषित पाण्यामुळे हजारो एक्कर जमीन नापीक झाली व भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, कोळी बांधवांचा पारंपरिक मासे व्यवसाय धोक्यात येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
पनवेल | शेतकर्यावर अन्याय होऊन नैना प्रकल्प होऊ देणार नाही, या भूमिकेचा पुनरूच्चार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. २६) परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या विचार मंच कार्यक्रमात केला. परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात साजरा करण्यात आला.
रोहा | वाढत्या ऑनलाईन खरेदीमुळे तसेच व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे ऐन दिवाळीपूर्व हंगामात व्यवसायासाठीच्या सुगीच्या दिवसात बाजारपेठेत थोडी शांतता असल्याचे चित्र सध्या रोहा बाजारपेठेत पहायला मिळत आहे. शनिवार व रविवारी या दिवशी बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले.
कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश कोळी यांनी दिली आहे. तस आ. थोरवे यांनीही सांभाळून घेण्याची विनंती केली आहे. कर्जतमध्ये महेंद्र थोरवे आणि भाजप यांचे सूर जुळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
माणगाव | महाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते बाबूशेठ खानविलकर हे आज, २८ ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणा आहे.
गोरेगाव | श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फैझल पोपेरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. फैझल पोपेरे हे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून याआधी काँग्रेसकडून बॅरिस्टर ए. आर. अंतुले, जनता पार्टीचे अब्दुल शकुर उकये यांनी अल्पसंख्यांक समाजाचे उमेदवार दिले होते.
कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे व त्यांची पत्नी नमिता हे ३३ कोटींचे मालक आहेत. त्यांच्याकडे अनेक गाड्या तसेच वेगवेगळ्या भागात जमिनी आहेत. तीन गुन्हेदेखील त्यांच्यावर दाखल आहेत. कर्जतमध्ये निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी राजीनामा देऊन, सुधाकर घारे निवडणुकीच्या रिंगणत उतरले आहेत.
उरण | विधानसभा निवडणुकीत महाआघाडीकडून काँगे्रसला रायगड जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्यानेकाँगे्रसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या पदाचा राजीनामा रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांना सुपूर्द केला आहे. जिल्ह्यात एक जागादेखील काँगे्रसला मिळणार नसेल तर अन्य पक्षांचे ओझे आम्ही उचलणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
महाड । धारदार हत्याराने वार करून एका इसमाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी महाड तालुक्यात उघडकीस आली असून याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली । सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धूम आहे. जिकडे पहावे तिकडे निवडणुकीच्या मैदानात इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, कर्जत - खालापूर मतदार संघात येणार्या खोपोली शहराचा भरभरून विकास झाल्याचे लोकप्रतिनिधींकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे.
21.1k
अलिबाग | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. २९ ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. म्हात्रे यांच्या उमेदवारीनंतर अलिबागमध्ये आता दोन शिवसेना रिंगणात पहायला मिळणार आहेत. सुरेंद्र म्हात्रे हे शिवसेना ठाकरे गटाचे जुने शिवसैनिक आहेत.
अलिबाग | शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांना पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उरतवले आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने त्यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. जिल्ह्यात आता महायुतीचे सात पैकी सहा उमेदवार जाहीर झाले आहेत. पेणचा तिढा मात्र अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.
कोर्लेई | रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वेार्गाची संयुक्त मोजणी करुन देण्यास शेतकरी तयार झाले आहेत. मात्र मोजणी झाल्यानंतर शेतकर्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर काम करु देणार नाही, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वेार्गाची मोजणीला शेतकर्यांचा विरोध त्यामुळे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी मुरुड येथे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना या प्रकल्पाची माहिती दिली.
कोर्लई | शासनाच्या स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने मुरुडमध्ये नगरपरिषद, भारतीय तटरक्षक दल, वसंतराव नाईक महाविद्यालय-राष्ट्रीय सेवा योजना,अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालय, सर एस.ए.हायस्कूल व तळा येथील जी.एम.वेदक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून समुद्रकिनारा चकाचक केला.
माणगाव | श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मंत्री अदिती तटकरे उद्या, २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत १ लाखाचे मताधिक्य घेऊन त्यांना निवडून आणू, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी व्यक्त केला आहे.
दिघी | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन गरोदर करणार्या तरुणाविरोधात दिघी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्ले आदिवासीवाडी येथील या मुलीसोबत सदर तरुणाने मैत्री केली.
म्हसळा | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या हक्काच्या श्रीवर्धन मतदार संघात खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांचा शासन मंजुर खर्च केलेल्या विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक पुर्व प्रचाराची घौडदौड सुरु ठेवली आहे.
रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमाने व माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या शतकोक्तरी रौप्य महोत्सव साजरा करणार्या शेठ करसनदास मुळजी वाचनालय ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रंथालयाचे संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पेण | मागील सुमारे दीड वर्षापासून जेएसडब्ल्यू कंपनीकडे काराव ग्रामपंचायतने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न केले. अनेकवेळा कंपनी प्रशासनाशी यासंदर्भात बैठकाही झाल्या परंतु कंपनीने कायम ग्रामस्थांची फसवणूकच केल्याची माहिती काराव सरपंच मानसी पाटील यांनी गडब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पेण | तालुयातील मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी येथे उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचा गाळा कमी रुंदीचा ठेवल्याने वरप, पाबळ भागात जाणारी एसटी बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाबळ खोर्यातील आदिवासी व कुणबी मराठा समाजात तसेच कोलेटी परिसरात तीव्र असंतोष पसरला असून या अन्यायाविरुध्द कोलेटी येथे ८ आटोबंर रोजी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरणार आहेत.
पनवेल | बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या घरावर फायरींग करून सलमान खानला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या टोळीतील मुख्य आरोपीला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुखबिर बलबिर सिंग उर्फ सुख्या शुटर असे त्याचे नाव आहे.
पाली/बेणसे | मुंबई गोवा महामार्गावर गावाजवळ मोठी दुर्घटना टळली. ज्वलनशील रसायन भरलेल्या टँकरने अचानक पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व स्थानिक बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोयात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी येथील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.
पाली | सुधागड तालुयातील खवली गावात असलेल्या जिल्हा परिषद रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रुग्णालयात उद्धर, शिरसेवाडी, पीलोसरी, विडसई यासह अनेक गावातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. हे रुग्णालय जर नसेल तर लोकांना पाली येथे दुरचाप्रवास करून यावा लागतो.
अलिबाग । गोल्डप्लॅग नावाचे बनावट सिगारेट बनवण्याचा कारखाना रायगड कॉईम बँ्रचने उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 कोटी 94 लाख 46 हजार 960 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला असून 15 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथा घार्गे यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे उपस्थित होते.
खोपोली | दरवर्षी प्रमाणे यंदाही खोपोलीतील भटया कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचे अभियान व्हेटर्नरी प्रॅटिशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, श्री कृपा एक्वेरियम - खोपोली, लायन्स लब ऑफ - खोपोली, रोट्रॅट लब ऑफ - खोपोली आणि शहरातील प्राणी मित्रांच्या माध्यमातून राबवण्यात आले.
पोलादपूर | प्रतापगडावरील आई भवानीच्या स्थापनेस ३६५ वर्षे यावर्षी पूर्ण झाली असून या निमित्ताने ८ ऑटोबर रोजी रात्री ८ वाजता किल्ले प्रतापगडावर ३६५ मशाली प्रज्वलित करुन मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. किल्ले प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने साक्षात आई भवानीच्या स्थापनेमुळे पुनित झालेल्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्वपूर्ण स्थान म्हणजे प्रतापगड अशी ओळख आहे.
पोलादपूर | पोलादपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर दोन वर्षे दोन तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळा | तळा शहरासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १३ कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचे काम धिम्या गतीने सुरु आहे. या योजनेचे भूमिपूजन १७ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले होते. याला आठ महिने उलटले, तरी या कामाने आवश्यक गती घेतलेली नाही.
तळा-किशोर पितळे-तळा तालुक्यातील दाहिवली बौद्धवाडी येथे मालती सीताराम शिर्के वय ५०या नावाच्या महिलेचा चाकूने वार करून दगडाने ठेचून हत्या केली असल्याची दुर्दैवीघटना घडलीआहे.
मध्य प्रदेश | मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. १५ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी व भावाने बलात्कार केला आहे. इतकेच नव्हे तर पीडित मुलीच्या भावाने तिचा अश्लील व्हिडिओदेखील बनवला आहे. तो व्हिडिओ दाखवून त्याने तिला वारंवार धमकावले आहे. पीडीतेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
नवी दिल्ली | महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजूरी दिली आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली | ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला केंद्रीय मंडळाने मंजुरी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘देशभर एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुकांचा समावेश असेल. पंचायतीसाठी, लोकसभेनंतर ‘शंभर दिवसां’त निवडणुकांचा प्रस्ताव आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
"लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्रर एकनाथ शिंदे यांनी बीड येथे कृषी महोत्सवात केली आहे
पती पतीमधील कौटुंबिक वादातून नवर्याने स्वतःसह तीन मुलांवर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री सुारे दहा वाजण्याच्या सुमारास केला.
मुंबई | यंदा निर्धारित वेळापेक्षा काहीसा आधीच राज्यात धडकलेला मान्सून आता मात्र राज्याचा निरोप घातना दिसला.असले तरीही पूर्वोत्तर मान्सूनची माघार म्हणजे महाराष्ट्रातील पावसाचा निरोप असे म्हणणे योग्य नसेल. कारण, अद्यापही मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकणातही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शयता वर्तवण्यात आली आहे.
नवी मुंबई | बेलापूर मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप नाईक यांनी पक्षाला सोडचिट्ठी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे महायुती अलर्ट मोडवर आली आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना निवडून आणण्याठी कुठल्याही प्रकारची हयगय होऊ नये, अशा सूचना महायुतीच्या नेत्यांनी दिल्या असल्याची चर्चा आहे.
नवी मुंबई | बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. नाईक बेलापूरमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ते अपक्ष लढतात की हातात तुतारी घेतात? याबाबतचा निर्णय मंगळवारी (२२ ऑक्टोबर) होण्याची शक्यता आहे.