खोपोली | खालापूर तालुयातील हाळ गाव, हाळ खुर्द, बुद्रुक या तिनही गावातील अवैध कत्तलखाने खालापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत. सदर कारवाई करताना तिनही हाळ गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक केले आहे. तर खालापूर पोलिसांच्या मोठ्या कारवाईचे स्वागत होत आहे.
सुधागड-पाली | अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुयातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व नूतनीकरणास अजूनही सुरुवात झालेली नाही. तसेच स्थानकाला खड्डे, जुन्या तोडलेल्या इमारतीचे डेब्रिज, उघडा नाला, दुर्गंधी आदी विविध समस्यांनी वेढले आहे.परिणामी येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
मुंबई | राज्यातील काही जिल्हा बँकांकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम आहे. परंतु या रक्कमेचे मूल्य शून्य रुपये आहे. बँकेच्या हिशेबी ही रक्कम शिल्लक असली तरी आठ वर्षांपासून त्यांचा निर्णय लागत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटीबंदी जाहीर केली होती.
महाड | महाड परिवहन आगाराला देण्यात आलेल्या पाच नवीन बसेसचे सोमवारी (३१ मार्च) रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ना. गोगावले यांनी महाड आगाराला ४० नव्या बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुरुड | रेवदंडा पूल ते कोर्लई, बोर्ली या दोन प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. २९.४० किमीच्या या रस्त्यासाठी १३९ कोटी ४८ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत रस्ते काँक्रीटचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. काँक्रीटचे रस्ते हे दीर्घ काळ टिकणारे असून मुरुड तालुक्यातील जनतेची रस्ते समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.
रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना मोफत ओषधे मिळणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेकडून १०० दिवसांचा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून आतापर्यंत रक्तदाब व मधुमेहाच्या ५५ हजार ४४६ रुग्णांनी नोंदणी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.
पनवेल | पोलिस दलात असल्याचे खोटे भासवून लग्न जुळवून घेतले. त्यानतर सासूचे १२ तोळे दागिनेही खासगी सावकाराकडे गहाण ठेवून पती, सासू आणि सासरा यांनी फसवणूक केल्याची फिर्याद विवाहितेने कळंबोली पोलिस ठाण्यात केली आहे. आरोपी हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या बिचुकले तालुयातील आहेत.
पनवेल | पनवेल परिसरात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सिडको प्रशासनाच्या नावाने नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली शहरात असुरळीत पाणी पुरवठा सुरु असला तरी नळाला मात्र कमी दाबाने येणार्या पाण्यामुळे पनवेलकरांचा घसा कोरडा पडत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून मार्केटमध्ये यावर्षी पाणी साठवून ठेवण्याच्या इमच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे इम विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
म्हसळा | म्हसळा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुक्यातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात याव, अशी मागणी तहसीलदार सचिन खाडे व पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्याकडे करण्यात आली. अवजड वाहतूक सुरू असल्याने भयंकर अपघात वाढत चालले आहेत. स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड | किल्ले रायगडावर वर्षभरात होणारे विविध उत्सव व कार्यक्रमासाठी होणारी अलोट गर्दी त्यासाठी असणार्या पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरुन येणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ‘किल्ले रायगड’ची माहिती व्हावी, यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाने ‘किल्ले रायगड’ची भव्य प्रतिकृती तयार करुन घेतली आहे.
अलिबाग | प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार असून, वाहनचालकांना लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
21.1k
मुरुड | मुरुडमधील जंजिरा किल्ल्याच्या नवीन जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही जेट्टी दिवाळीत पर्यटकांसाठी खुली होईल, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली आहे. मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. राजपुरी व खोरा बंदर या जेट्टीवरुन ते किल्ला पाहण्यासाठी बोटीने येत असतात. मात्र मार्चनंतर समुद्राच्या पाण्याला वेग येतो आणि बोटी हलायला लागतात.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. माणगाव शहरातील तीन बत्ती नायावर कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माणगाव | तालुयातील विळे-भागाड येथे घरफोडी चोरी करून २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद राजकुमार भाऊराव शंभरकर (वय- ६२) रा.एमएसएल कॉलनी विळे- भागाड, माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
धाटाव | रोहा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील अनिल कुंभार या शिक्षकाने शाळेतील ६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करत, शिक्षक अनिल कुंभार याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रोहा तालुका हादरला असून, पालकांमधून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
धाटाव | रोहा अष्टमी नगरपरिषदेजवळील रस्त्यावरुन जाताना मोटारसायकल दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात रोहा भुवनेश्वर येथील अमोल मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अमोलची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. गुरुवारी (२० मार्च) उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरापासून जवळच असलेल्या श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणी घाटातील उतारावर श्रीवर्धनकडे येणार्या ट्रेलरला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर अचानक ट्रेलरने पेट घेतला. सुदैवाने चालक व क्लीनर वेळीच बाहेर पडले. मात्र ट्रेलर जळून खाक झाला आहे. या ट्रेलरमध्ये कन्ट्रक्शनसाठी लागणारे लोखंडी स्टील होते.
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी सेल्फीच्या नादात एका महिला पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातून पर्यटनासाठी नऊ महिला श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे आल्या होत्या.
म्हसळा | म्हसळा सकलप फाटा येथे ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणार्या आयवा डंपरचा अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (२४ मार्च) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीवर्धन हरिहरेश्वर हद्दीतून रोज हजारो टन मायनींग (मिश्रीत माती) ट्रक ट्रेला, आयवा डंपरने श्रीवर्धन, म्हसळा राज्य मार्गाने आणि दिघी पुणे राष्ट्रीय मार्गाने वाहतूक करण्यात येत आहे.
पेण | पेण तालुयातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खवसावाडी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हर्षा कन्स्ट्रशन यांनी ६० लाखांचा ठेका घेऊन रस्ता पूर्ण केल्याचा दावा अधिकार्यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणीअंती या वाडीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नाही, हे उघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पेण | होळी, धूलिवंदन, ईद, रंगपंचमी आदी सणांदरम्यान पेण तालुयातील नागरिकांनी सण उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये किंवा कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दिल्या होत्या. अनेक नागरिकांनी आपला सण उत्सव उत्साहात पार पाडला.
सुधागड-पाली | वाढत्या शहरीकरणामुळे आणि हवामान बदलामुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांची संख्या चिंताजनक प्रमाणात घटत आहे. या पोर्शभूमीवर, कडायाच्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना आणि नागरिक पुढाकार घेत आहेत. अनेक जण भूतदया दाखवताना दिसत आहेत.
कर्जत | कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरणाचे परिसरातील २० गावातील शेतकर्यांनी आपल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते.साखळी उपोषणाच्या दुसर्या दिवशी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांच्या सर्व मागण्यांवर एका महिन्यात कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
माथेरान | पर्यटकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान मिनी ट्रेनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
खोपोली | खालापुर तालुयात अनेक जल जीवन पाणी योजनेचे काम मार्च महिना अखेरीस सुरू असून काही जल जीवन मिशन पाणी योजनेचे काम बंद असल्याने संबंधित ठेकेदांराच्या विरोधात ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असून ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
उरण | उरण-नेरूळ लोकल मध्येच बंद पडल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल झाले. या लोकलमधून प्रवास करणार्या प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरुन चालत, पर्यायी वाहन पकडून घर गाठावे लागले. याआधी जानेवारी महिन्यातदेखील अशीच लोकल बंद पडली होती. लोकल बंद पडण्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उरण | विरार-अलिबाग कॉरीडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसताना आता, नवीन ग्रीनफिल्ड राष्ट्रीय राजमार्ग (पागोटे -राष्ट्रीय राजमार्ग ३४८ ते चौक) साठी चिरनेर व कळंबुसरे येथील शेतकर्यांच्या जागांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. याबाबत कुठलीही माहिती न देता हे सर्व्हेक्षण सुरु केल्यामुळे शेतकर्यांनी त्याला विरोध केला आहे. यावेळी संबंधीत अधिकार्यांनी दमदाटी केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
पोलादपूर | महाड तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील इसाने कांबळे येथून शनिवारी, २२ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कोणी तरी अज्ञात इसमाने दोन अल्पवयीन मुलींना फिर्यादीच्या आई वडिलांच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले असून दोन्ही अल्पवयीन मुली या सख्ख्या बहिणी असल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.
पोलादपूर | रायगडात विशेषतः दक्षिण भागातून मोठ्या शहरांमध्ये कामाधंद्या निमित्ताने गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी गावाकडे आले आहेत. त्यामुळे गावं भरली असून, एक वेगळाच उत्साह सर्वकडे पहायला मिळत आहे. आज होळी असून उद्या धुळवड साजरी करण्यात येणार आहे. होळीसाठी बुधवारी (१२ मार्च) हळकुंड सजविण्यात आले आहे. तर रात्री चोर होळी उत्सव जोरदार साजरा करण्यात आला. अनेक चाकरमानी गावागवात दाखल झाल्याने वर्दळ वाढली आहे.
तळा/अलिबाग | भैय्या एक पिशवी दो...ताई एक पिशवी द्या...घरातून हात हलवत बाजारात गेल्यानंतर, पिशवीसाठी दुकानदाराकडे हात पसरण्याची घाणेरडी सवय, मुक्या जनावरांसाठी किती घातक ठरते? याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पहायला मिळाले. पुसाटी येथील एका गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक काढण्यात आले.
तळा । तळा नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर वाढीच्या नोटीसा बजावल्या असुन जाचक वाढीव कर विरोधात सर्व पक्षीय नागरिक आक्रमक झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कर परवडणारे नसुन रहीवासी सामुहिक हरकती नोंदवीण्यासाठी नगरपंचायत समोरआक्रमक पवित्रा घेणार आहेत. तालुका डोंगराळ दुर्गम असून शहरात नगरपंचायतीने मुलभूत सोयी सुविधा दिल्या नाहीत. पाणी एकदिवस आड येत आहे.
उरण | उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची बदली होऊन तीन ते चार महिने झाले तरीही उरण पंचायत समितीला अद्याप कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असून, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
नागपूर | केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरु आहेत. शेतकर्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकर्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे | पुण्यातून सुरु झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळत आहेत. दुषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचे सांगितले जात होते. मात्र चिकनमुळेही ‘जीबीएस’चा आजार होऊ शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे चिकन पूर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
मुंबई | मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरीता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
मुंबई | पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांच्या गुंतवणुकीसंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे लवकरच बैठक घेण्यात येईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी आणि ठेवीदार यांना बोलवण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.