सोगाव | अलिबाग वडखळ मार्गावर निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या कार्लेखिंड येथील लहान पात्रुदेवी मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींकडून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. सदर ओला कचरा मोठ्या प्रमाणात टाकत असल्याने ते कुजल्यामुळे कुबट व घाण वास येत असतो.
पनवेल | राज्यातील बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे कार्यान्वित करण्याची मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे केली. त्या अनुषंगाने लवकरच सर्व आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याचे ओशासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लेखी स्वरूपात दिले. राज्यात सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीत ४१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सद्यःस्थितीत त्यातील २१३ केंद्र अद्याप सुरू झाली नसल्याचे मे २०२५ मध्य
नवीन पनवेल | वास्तव्याच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट वास्तव्याचे पुरावे तयार केले आणि त्या पत्त्यावर राहत असल्याचे भासवून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २४ जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
कर्जत | कर्जत कल्याण राज्यमार्गावर आयशर टेम्पो आणि मोटारसायकलमध्ये भीषण अपघातात घडला. यावेळी मोटारसायकलवरून प्रवास करणारे दांपत्य गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या जिओ टॅगिंगला जिल्ह्यातील ठेकेदारांनी विरोध केला आहे. ग्रामीण भागात अजूनही नीट इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गैरसोयीची आणि त्रासदायक ठरणारी जिओ टॅगिंग प्रणाली रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन ठेकेदार संघटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना दिले आहे.
अलिबाग | जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणार्या पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ या मार्गावर दर शनिवार व रविवार जड- अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
अलिबाग| उमाजी म. केळुसकर | आज, ५ जुलै रोजी, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी अध्याय लिहिला जात आहे. तब्बल एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत बंधू एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे सकाळी १० वाजता एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. ‘विजय मेळावा’ हे या ऐतिहासिक एकत्र येण्याचे निमित्त आहे.
सुधागड-पाली | सुधागड तालुयातील पाली नगरपंचायत हद्दीत माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पालीकर अक्षरशः माकडांकडून हैराण झाले असून त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण झाला आहे. माकडे गॅलरीमधील कुंड्यांमध्ये हात घालून झाडांची नासधूस करतात. खिडयांमधून घरात प्रवेश करून अन्नधान्य उद्ध्वस्त करतात.
कर्जत | कडाव एसटी थांब्यावरीस बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात सर्व पत्रकारांनी एकत्र येत १५ जुलै रोजी कडाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन देण्यात आले आहे. कर्जत तालुयातील कडाव गावात १९७७-७८ साली एसटी महामंडळाने अधिकृतरित्या उभारलेल्या बस थांब्यावर आज बेकायदेशीररित्या अतिक्रमण झाले आहे.
मुंबई | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला असून रविंद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. वरळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये रविंद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.
अलिबाग | आज मध्यरात्रीपासून अवजड वाहने, खासगी बस, शाळेच्या बस यांच्या चालक-मालकांचा बेमुदत संप सुरु होणार आहे. यात मुंबईच्या ३० हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे. जेएनपीटी येथील ३८ हजार कंटेनर वाहतूक चालकांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच इतरदेखील खासगी बसचालक, मालक हे या संपात सहभागी होणार आहे.
मुरुड जंजिरा | मुरुड तालुयातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर अंतर्गत ते जेट्टीपर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
21.1k
मुरुड जंजिरा | करंजा-रेवस रेड्डी या समुद्री महामार्गावरील नियोजित पुलांचे बांधकाम सुरू झाल्याने याठिकाणी कोळी मच्छिमारांना उद्भवणार्या समस्या व त्यामुळे होणार्या आर्थिक नुकसानीमुळे कोळी बांधव हैराण झाले आहेत. यासंदर्भात अधिकारी व मच्छिमार प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावून तोडगा काढावा; अन्यथा हे काम बंद करावे, असे निवेदन रायगड जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
माणगाव | माणगाव शहरात वाहतूक शिस्तीचा भंग रोखण्यासाठी आणिबेकायदेशीर वाहनधारकांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने माणगाव पोलीस आणि वाहतूक विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवून शहरात माणगाव, पुणे या महत्त्वाच्या मार्गावर तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी केली.
माणगाव | माणगावकरांचा शहराच्या विकासाच्या दृष्ठीने अत्यंत महत्वपूर्ण असणार्या विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली असून आता नगरीचा नियोजनबद्ध असा सर्वांगीण सुंदर विकास होईल, अशी माहिती नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. माणगावकर गेली अनेक वर्षांपासून शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळावी याच्या प्रतीक्षेत होते.
कोलाड | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. सोमवारी (२३ जून) रात्री खांब हद्दीत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी जखमी झाले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खांब हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर ही दुर्घटना घडली.
धाटाव | धाटाव एमआयडीसीतील निलिकॉन व एफडीसी कंपनीच्या कॉर्नरवर गटाराच्या कामासाठी एक भला मोठा खड्डा खोदलेला होता. तेथे ठेकेदाराने चक्क मातीचा ढिगारा रचून ठेवलेला असल्याने पावसामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. या रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसापासून रखडलेले आहे. त्यामुळे कामगारांसह केमिकल टँकर वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दिघी | रायगड एसटी महामंडळाकडून श्रीवर्धन तालुयासाठी रोहा डेपोची गाडी देण्यात आली आहे. मात्र, या नादुरुस्त एसटीमुळे अपघात अपघात होता होता वाचला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांची मोठी दुर्घटना टळली आहे. श्रीवर्धन डेपोसाठी रोहा येथून आलेली एमएम १३ सीयू६८९६ या क्रमांकाची एसटी शनिवारी (२८ जून) सकाळी सहा वाजता प्रवाशांना घेऊन मुंबईहून श्रीवर्धनकडे सुटली.
श्रीवर्धन | श्रीवर्धन दिघी मार्गावर म्हाबदे घाटामध्ये दिघीच्या बाजूकडे जाताना सपाट असलेल्या रस्त्यावर डाव्या बाजूला मोठा दुर्गंधीयुक्त कचर्याचा ढीग लावण्यात आलेला आहे. म्हाबदे घाट हा अत्यंत निसर्ग रम्य असा परिसर आहे. याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी, त्याचप्रमाणे प्राणी यांचा नियमित वावर असतो.
म्हसळा | तालुयातील कुडतुडी गौळवाडी येथील शेतकरी अिेशनी अशोक कासार यांच्या मालकीचा बैल, गाय आणि दुसरे शेतकरी शंकर लक्ष्मण मिरगल यांची गाय अशी तीन गुरे गावाशेजारील जंगलात चरायला गेली असता वीजवाहिनीची तार तुटून पडल्याने दगावली.
म्हसळा | तालुयांत वारळ गावच्या महिला सरपंच यांनी स्थानिक ग्रामस्थाविरुध्द म्हसळा पोलिसांत अब्रु नुकसानीची तक्रार केली आहे. या ग्रामस्थावर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७, ८, ७९, ३५२, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण | पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उठविल्यानंतर पेण तालुक्यातील जोहे, हमरापूर, कळवे विभागातील गणेश मूर्तीकारांनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. सदर मिरवणुकीत शेकडोंच्या संख्येने कारखानदार व कुटुंबीय सहभागी झाले होते. हमरापूर-जोहे हा भाग गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे हजारो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या गणेशमूर्तींना राज्यासह देशात तसेच परदेशात देखील मोठी मागणी आहे.
पेण | मुंबई-गोवा महामार्गावर मोटारसायकलला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागलेली मोटारसायकल ही इलेक्ट्रीक बाईक असल्याची माहिती मिळाली आहे.
सुधागड-पाली | पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुयातील पडसरे गावाला जोडणारा पूल अक्षरशः मोडकळीस आला असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. हा पूल पडसरे गावाला व येथील आदिवासी आश्रमशाळेला सुधागड तालुयातील सर्व गावांशी जोडतो.
खोपोली | खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोमल कराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी, ३० जून त्यांनी पदभार स्वीकारला. कराळे या विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. खालापूर नगरपंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी रश्मी चव्हाण रजेवर होत्या.
खोपोली | खालापूर येथील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांना पक्षात पुन्हा एकदा पावन करुन घेतल्यानंतर, राष्ट्रवादीने त्यांच्यावर कर्जत विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुन्हा जेव्हा या तालुक्यात येईन तेव्हा तुमच्या आनंदाला उधाण आलेले असेल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी घारे यांना दिले होते.
उरण | मनसेच्या दणक्यानंतर उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टमधील न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल (एनएसएफटी) जे.एम.बक्षी अँड सीएमए टर्मिनल्स पोर्टने नमते घेत, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली नोकरभरतीची जाहिरात रद्द केली आहे. यापुढे स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन नोकरभरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे.
जेएनपीटी | महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ मोहिमेअंतर्गत न्हावा शेवा बंदरात केलेल्या कारवाईत पाकिस्तानातून आयात केलेल्या मालाचे ३९ कंटेनर जप्त केले आहेत. पाकिस्तानातून आलेला सुमारे ९ कोटींचा १ हजार ११५ मेट्रीक टन माल दिशाभूल करण्यासाठी दुबई मार्गे भारतात पाठवला होता.
महाड | पावसाळ्यातील नैसर्गिक धबधबे व पर्यटन स्थळी होणार्या दुर्घटना लक्षात घेऊन महाड तहसिलदार व महाड तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महाड तालुक्यातील मांडले, केंबुर्ली, वाकी बुद्रुक येथील नानेमाची, भावे, शेवते/आड्राई, रानवडी सातसडा येथील नैसर्गिक धबधबे तसेच महाड तालुक्यातील कोथुर्डे, वरंध, खैरे, कुर्ले, खिंडवाडी येथील आणि सव येथे गरम पाण्याचे कुंड या ठिकाणी ३ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत जाण्यास बंदी केली आहे.
महाड | किल्ले रायगडवर धनगर समाजाची भेट घेण्यासाठी आलेले आमदार गोपीचंद पडाळकर यांनी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘छत्री निजामपूर’ गावाच्या नावाला आक्षेप घेतला आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो रायगड किल्ला आज "छत्र निजामपूर ग्रामपंचायत” या नावाने ओळखला जातो, ही आपल्या अस्मितेची शोकांतिका आहे, असे आ.पडाळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोलादपूर | जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्याची बातमी एप्रिल महिन्याअखेरीस ‘रायगड टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थवर्ग रूंदावणार्या भेगांमुळे खडबडून जागा झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा प्रकार गांभीर्याने विचारात घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिला.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील एका बंधार्यात आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा तोल गेल्याने तो वाहून गेला आहे. सोमवारी दुपारपासून तपासकार्य सुरु होते. मात्र, उशीरापर्यंत तपास न लागल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. जोगेश सुरेन ओरन (वय २१ वर्षे) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएससीने दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२६ पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी सीबीएसई बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर सीबीएसईने दहावी बोर्डाची दोन वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुंबई | राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.