उरण । सध्या पितृपक्ष सुरु आहे. या काळात अनेक ठिकाणी पूर्वजांचे स्मरण करुन त्यांना नैवैद्य अर्पण केले जाते. घरावर किंवा टेरेसवर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यावेळी सर्वांना आठवण येते ती कावळ्याची; कारण पूर्वजांच्या नावाने ठेवलेले अन्न ग्रहण करण्यासाठी कावळ्याला बोलावले जाते.
श्रीवर्धन । तालुक्यातील नानवली समुद्र किनार्यावर तब्बल 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला असून दिघी सागरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ मासेमारीसाठी गेले असता किनार्यावर एक संशयास्पद गोणी आढळून आली.
पनवेल । न्यायालयाच्या बनावट आदेशाची प्रत तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई 12 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात फिर्यादी लाधवजी पटेल हे बांधकाम व्यावसायिक असून वाशी येथे राहतात.
पनवेल । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करतानाच स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय व नोकरीत प्रथम प्राधान्य मिळणार नसेल तर 30 सप्टेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने (ठाकरे गट) दिला आहे.
अलिबाग | राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी हैद्राबाद गॅझेटीअरच्या आधारे मराठा समाजाला सरसकट कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याचा घेतलेला निर्णय संपूर्ण कोकणात संतापाचा ज्वालामुखी ठरत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई आणि उपनगरातील सर्व तहसील कार्यालयांवर सोमवारी कुणबी समाजोन्नती संघ व ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने संतप्त कार्यकर्त्यांनी धडक मारत निवेदने दिली.
धाटाव । रोहा आगारातील रोहा, कोलाड, भाले मार्गावरील एस.टी. बस सोमवार, 15 सप्टेंबर रोजी पलटी झाली. या अपघातात चार विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीमधील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा रखडलेला प्रश्न अधिक तीव्र होताना दिसत आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सात दिवसांत तोडगा काढा; अन्यथा होणार्या परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा निर्वाणीचा इशारा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे.
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अलिबाग-वडखळ महामार्ग सध्या खड्ड्यात गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. नुकतेच अलिबागकर रस्त्यावर उतरून संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले होते. यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. मात्र, दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप पुढे आला आहे.
महाड | औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून, नियमानुसार उत्पादन, कायद्यांचे पालन, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना, कामगार सुरक्षा या बाबींची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची तपासणी मोहीम महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामार्फत सुरु करण्यात आली आहे.
उरण । उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात सोमवारी (8 सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले, तर नागावसह आसपासच्या वस्त्यांमध्ये घरांच्या काचा फुटल्या व नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
गोरेगाव | मुसळधार पावसामुळे ढालघर लोणशी उणेगाव गोरेगाव मार्गे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या सुरक्षेचा विचार करून वाहतूक बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
21.1k
मुरुड-जंजिरा । मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी येत्या 2 ऑक्टोबरपासून खुला होणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बंजरंग येळीकर यांनी दिली. सध्या किल्ल्याची सफाई व इतर आवश्यक कामांना गती देण्यात येत आहे.
कोर्लई । रायगड जिल्हा वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन या पोलीस खाते व शिक्षण खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेकडून रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होणार्या गणेश विसर्जन मिरवणुकीत असलेल्या पोलीस बंदोबस्तात सहभाग घेतला जातो.
लोणेरे | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले लोणेरे येथील उड्डाणपुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात असून, गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
रोहा | रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादादीत टपर्या अखेर बुधवारी (२० ऑगस्ट) जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली. म्हाडा वसाहतीचे शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते.
रोहा | रोहयात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रोहयात सततधार पाऊस सुरू होता, या पावसाने गोविंदा पथकांमध्ये जान आणली, हा पारंपारिक सण अतिशय आनंदात साजरा झाला. शहरातील तिन्ही प्रमुख आळयांमधुन गोविंदा निघतो, दुपारनंतर एकामागुन एक असे ठरलेल्या क्रमाने हे गोविंदा रोहा बाजारपेठेत आले, येथिल उंच दही हंडया फोडण्यात आल्या.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यात मोकाट घोडे व गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन भट्टीचा माळ बस थांब्याजवळ एका तरुणाचा गंभीर अपघात झाला आहे. घोडा रस्त्याच्या मध्ये आल्यामुळे ही दुर्घटना घडली. श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध झाला आहे.
म्हसळा । म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी जाहीर केली.
म्हसळा | म्हसळा तालुक्यात आणखी एका वृध्दाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (३१ जुलै) रोजी समोर आली आहे. ही हत्या नातवानेच केल्याची माहिती समोर आल्याने म्हसळ्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण | मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंटसमोर एनपीआर सीसीटिव्ही कॅमेरांचे लोकार्पण आज, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
पेण | पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज-३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील आमच्या काही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पाली । अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बुधवारी (10 सप्टेंबर) भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 15 पैकी 9 मते मिळाली, शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांना 5 मते मिळाली. एक मत तटस्थ राहिले.
सुधागड | पाली नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज (बुधवारी १० सप्टेंबर) होत आहे. राज्यात महायुतीतील दोन मित्रपक्ष भाजप व शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवारएकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीतील आणखी एक भिडू असलेल्या राष्ट्रवादीने आपले वजन भाजपच्या पारड्यात टाकल्याचे चित्र आहे.
कर्जत । कर्जत तालुक्यातील हालीवली आदिवासी वाडीतील स्मशानभूमीत दोन महिन्यांपूर्वी जादूटोणा व अघोरी कृत्याला विरोध करणार्या एका आदिवासी युवकाला मारहाण करण्यात आली. त्यामुळे आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त करीत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मारहाण करणार्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी अॅक्ट, अंधश्रद्धा जादूटोणा, अघोरी कृती संदर्भात गुन्हा दाखल केला.
कर्जत | तालुक्यात सलग तीन चार दिवस पाऊस आहे, मात्र पाऊस थांबून पडत असल्याने सर्व नद्या धोक्याच्या पातळीपुढे गेलेल्या नाहीत. दरम्यान, उल्हास नदीवरील कमी उंचीच्या दहिवली मालेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
खोपोली | तालुक्यातील इर्शाळवाडी दरडग्रस्तांवर आभार कोसळले आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा मृत्यू झाला. सरकारने या वाडीमधील लोकांचे डोंगराच्या पायथ्याशी पुर्नवसन करुन दिले. टुमदार घरं, पाणी, रस्ता, वीजही दिली; मात्र मूळ गाव सुटल्याने दरडग्रस्तांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, चौक ग्रामपंचायतीने आकारलेल्या घरपट्टीची रक्कम बघून फेफरं येण्याची वेळ इथल्या दरडग्रस्तांवर आली आहे.
खोपोली | खंडाळा घाटातील मंकी हिल रेल्वे ट्रॅकवर पेट्रोलिंग करणार्या कामगारांमध्ये झालेल्या शाब्दीक वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. रमेशचंद्र वर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.
महाड | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई गुजरात येथून मोठ्या संख्येने चाकरमानी महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात दाखल झाले आहेत. दीड दिवसीय आणि रविवारी पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केल्यानंतर, आता परतीच्या प्रवासाची वेळ जवळ येत असून, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या महाड आगाराने यंदाही विशेष तयारी केली आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या तब्बल सहा लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, अलिबाग आणि महाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विभागाच्या भरारी पथकाने दिविल गावातील एका बंद घरावर छापा टाकला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर | राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री बनवा या मागणी चक्क सोलापूर जिल्ह्यातून मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर त्यासाठी एका पदाधिकार्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनाच मिळावे, यासाठी शिवसेना जोर लावून आहे.
नवी दिल्ली | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच दिल्ली दरबारी पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यातील चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई । महाराष्ट्रातील सर्वात मोठा नोकरी घोटाळा उघडकीस आला असून थेट मंत्रालयात मुलाखत घेऊन बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी लॉरेन्स हेन्री याला मुंबईतून अटक केली असून सहाजण अद्याप फरार आहेत.
मुंबई | राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
मुंबई | कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यासाठी, गणेशभक्तांना पास मिळवण्यासाठी यंत्रणाही उभी करण्यात येत आहे.