सुधागड-पाली | सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. मात्र या लग्नाकार्यात अवकाळी वादळी पावसाचे विघ्न येत आहे. ऐन उन्हाळ्यात सातत्याने पडणार्या मुसळधार अवकाळी पावसामुळे लग्नघरात गोंधळ होत आहे. अचानक येणार्या या अवकाळी वादळी पावसामुळे लग्न मंडपाची दैना उडत असून वर्हाडी मंडळींची धावाधाव होतांना दिसत आहे.
कर्जत | कर्जत हे केवळ निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ नसून ते एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण आहे. या परिसरात अनेक किल्ले, लेण्या, घाटवाटा तसेच शतकानुशतकांचा इतिहास साठवून ठेवणार्या वास्तू आढळतात. कर्जत मध्ये कायम भटकंती करणार्या एका समूहाला अशीच एक ऐतिहासिक गोष्ट सापडली आणि ती म्हणजे धेनुगळ शिलालेख.
पाली/ वाघोशी | सुधागड तालुका हा वनीकरणाने विखुरला आहे. मोठ्या प्रमाणात जंगल भाग आहेत. यामध्ये सागाचे झाडांच्या अवैद्यरित्या तोंड करून साठवणूक करण्यात आली आहे. तालुयातील पेडली सर्वे नंबर ६/२/२, भालगुल येथील फार्म हाऊस, भारजेवाडी येथील सर्वे नंबर ४३८ व ३१२ या ठिकाणीसागांचे झाडांची वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर मिसळ यांनी सांगितले.
श्रीवर्धन | सतत बदलत असलेले हवामान, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वास्तविक पाहता श्रीवर्धन मधील तापमान ३२ किंवा ३३ अंश सेल्सिअस इतकेच असते. परंतु हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे हे तापमान ३८ ते ४० सेल्सिअस असल्याचे जाणवते. प्रचंड उष्म्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, घामाने अक्षरशः अंघोळ होत आहे.
अलिबाग | रविवार, ११ मे २०२५ रोजी पाठारे क्षत्रिय अष्टागर समाज झिराड या संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन ‘तपस्वी रामजी लक्ष्मण घरत’ समाज मंदिरातील पंढरीनाथ रघुनाथ तथा दादा पुरो सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शासकीय लेखा परीक्षक सुहास यशवंत म्हात्रे हे होते.
पाली/बेणसे | उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुया चार्याचा देखिल अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे पालीत डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावर जावून मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोयात आले आहे.
सुधागड-पाली | दक्षिण रायगड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात मजबूत नेतृत्वाचा ठसा उमटवणारे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांची पुन्हा एकदा भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
पनवेल | अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पनवेलमधील करंजाडे येथे केलेल्या कारवाई ध्ये ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या बांगलादेशींना पनवेलमधील मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येऊलकर (५२) याने कर्नाटक राज्यातील ईस्माइल शेख याच्यामार्फत बनावट पासपोर्ट आणि जन्मदाखले बनवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
नागोठणे | उन्हाळी सुट्ट्या असल्याने शनिवार व रविवारी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. परिणामी वाहनांची गर्दी वाढते. वाहतूक कोंडी होते. त्यामुळे १७ व १८ मे तसेच २४ व २५ मे या मे महिन्यातील तिसर्या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवार व रविवारी स्थानिक नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने धरमतर ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा, अलिबाग-रेवदंडा-मुरुड मार्गावर अवजड वाहनांना बंदी केली आहे.
अलिबाग | भाताचे कोठार’ म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्र अनेक कारणांनी कमी होत चालले आहे. एकट्या पेण तालुयातील दादर परिसरातील तब्बल अडीच हजार एकर भातशेती खारफुटीने गिळंकृत केली आहे. त्यामुळे ही खारफुटी तोडण्याची परवानगी द्या किंवा शेतकर्यांच्या शेतजमिनी मोकळ्या करून द्या, अशी मागणी शेतकर्यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
महाड / पोलादपूर । महाड आणि पोलादपूर येथे मंगळवारी झालेल्या दोन विविध अपघातांम ध्ये दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. कापडे बुद्रुक हद्दीत झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या घटनेत महाड विन्हेरे मार्गावर विक्रम रिक्षा आणि आयशर टेम्पोची धडक होऊन एकाचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले.
21.1k
दिघी | एकीकडे सूर्य आग ओखत आहे.वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे. त्यात आणखी भर म्हणून देखभाल व दुरुस्तीसाठी श्रीवर्धन वाळवटी सेक्षांची मंगळवारी दिवसभर वीज खंडीत करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, आता घराबाहेर ही पडवेना आणि घरातही बसवेना अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने श्रीवर्धन तालुका चांगलाच तापला आहे.
दिघी | बोर्लीपंचतन एसटी निवारा शेडचे विस्तारीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी होत असताना बाजारपेठेतील गर्दी तसेच वाढत्या पर्यटकांसोबत महिला एसटी प्रवाशांची याठिकाणी शौचालयाची मागणी होत आहे. स्वच्छतागृहांअभावी परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. गेली कित्येक वर्ष बोर्ली शहराला शौचालयाच्या समस्येने ग्रासले आहे.
माणगाव | भरधाव वेगाने येणार्या मारुती इको गाडीची अँटिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. सदरील अपघात हा मंगळवारी, ६ मे रोजी रात्री ८.३० वाजता माणगाव तालुयातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल कोकण सम्राटजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली फाट्याजवळ घडला.
माणगाव | तालुयात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुयाच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे.
धाटाव | रोहा तालुयातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा खटला माणगाव कोर्टात चालला, ८ मे रोजी निकाल जाहीर झाला, मात्र सर्व आरोपी निर्दोष सुटले. कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (१३ मे) पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढत संतापाला वाट करुन दिली.
खारी/रोहा | महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना संलग्न रोहा तालुका शाखेच्या माध्यमातून कृषी सहाय्यक संघटनेच्या कार्यकारी पदाधिकारी वर्गाने उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे आणि रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांना आपल्या प्रलंबित विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठीचे निवेदनाद्वारे ५ मेपासून ते १५ मेपर्यंत विविध स्तरावर आंदोलन पुकारल्याचे नमूद केले आहे.
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुयातील बोर्लीपंचतन गावाला पाणी पुरवठा करणार्या कार्ले नदी लगत असणार्या विहिरींच्या परिसरातील नदी पात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेजग्याचा उपसा होत असल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरींमधील पाण्याची पातळीसुध्दा कमी होत असून पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
म्हसळा | महामार्गांवर मोकाट गुराुंळे होणार्या अपघातांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर अशाच एका अपघातात म्हसळा तालुयातील घोणसे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश धोंडू कानसे (वय ४८) गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (१५ मे) त्यांचे निधन झाले. १२ मे रोजी सरपंच रमेश कानसे हे गावची मिटींग आटोपून बुलेट गाडीने म्हसळा शहरातील निवासस्थानी परतत होते.
म्हसळा | तालुयातील अती दुर्गम भागातील कोळवट येथील ग्रामस्थांवर गाव मंदिरात मधमाशांनी हल्ला करण्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजताचे दरम्यान घडली आहे. मधमाशांच्या हल्यात गावातील ४२ ग्रामस्थ जखमी झाले. जखमीमध्ये एक गतीमंद तर एक वयोवृद्ध आणि १३ बालकांचा समावेश आहे. कोळवट ग्रामस्थ दर सोमवारी मंदिरात सकाळी महाआरतीसाठी जातात.
पेण | पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे पोलिस कर्मचारी रुपेश पांडुरंग भोनकर (वय ५०) यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेस (रेल्वे क्र. १२६१९) च्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर रेल्वे गाडी मुंबईहून मेंगलोरकडे जात असताना, पेण हद्दीतील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना जोरदार धडक बसली.
पेण| महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकात ऐन लग्नसराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झाले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन सोमवारी (५ मे) संध्याकाळी माणगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्या. त्याचा परिणाम एसटीच्या दैनंदिन फेर्यांवर झाला. पेण बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
पनवेल | रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी तुल्यबळ आणि प्रमुख समजल्या जाणार्या शेतकरी कामगार पक्षाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. अलिबाग येथील दणयानंतर पनवेल उरण मध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात ओहोटी लागली आहे, आणि भारतीय जनता पक्षात महाभरती सुरू झाली आहे.
कर्जत | कर्जत आणि खालापूर तालुयात शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन होत नाही हे दुर्दैव असून, पाच वर्षात असे मंच उभे राहिले नाही, ही बाब गंभीर असून कृषी संशोधन केंद्रामधील तुमची नियुक्ती कशासाठी आहे? याचा जाब विचारला जाईल, असे कृषी संशोधन केंद्राला ठणकावून सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी हमी भावाने भाताची विक्री करणार्या शेतकर्यांना त्याचा मोबदला मिळत नाही ही भूमिका अतिशय चुकीची असल्याचा आरोप थोरवे यांनी केला.
खोपोली | गेल्या आठवड्यांपासून दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. दिवसभर कडक ऊन व अचानक दुपारी तीन ते चारनंतर पडणारा पाऊस स्थिती आहे. खोपोली शहरातील रस्त्यावरांवर पाणी साठत असतानाच १४ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता मुसळधार अवकाळी पाऊस पडल्यामुळे शास्त्री नगर हद्दीतील गिरनार बिल्डींगसमोरील गटार तुंबून रस्त्यावर तळे बनले होते.
खोपोली | आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतील काळ्या धुराच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाच कंपनीने दूषित सांडपाणी वेगवेगळ्या शेतांमध्ये सोडल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेती नापीक होण्याच्या भितीने शेतकरी आक्रामक झाले आहे.
उरण | बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्या दोन बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्यांनी ९ मे रोजी छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४ हजार, ३ हजार वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.
उरण | पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बुधवारी (७ मे) मॉक ड्रिल करण्यात आले. यात उरणमधील सात ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ करण्यात आला.
महाड । महाड शहर आणि तालुक्यातील मटका, जुगारासह इतर अवैध धंदे बंद व्हावेत, या मागणीसाठी शिवभक्त सुभाष मोरे यांनी मंगळवारी (१३ मे ) महाड शहर पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवित त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
पोलादपूर | पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणार्या वैभव पालकर यांचा ४ मे रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र या अपघातानंतर आयशर चालक हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळे | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागले आहे. आ. थोरवे, आ. दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हेदेखील तटकरेंसोबत एकत्र पहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
नवी दिल्ली। न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला. त्यांच्यानंतर न्यायमर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यामुळे त्यांचे नाव पुढे केले.
इंदूर | इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी शहरात भिकार्यांची संख्या पाच हजार होती. इंदूरसह देशातील १० शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुचा विेशास बसणार नाही.
रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
मुंबई | ग्रामपंचायत,जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवायची असल्यास, त्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे.
मुंबई | नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते. नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते.