मुरुड-जंजिरा | मुरुड जंजिरा परिसरात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषतः मुरुड कोळीवाड्यात पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि विधिवत पूजनासह होलिका दहन आनंदात पार पडले. यंदा २ मार्च रोजी रात्री १२ वाजता होलिका दहन करण्यात आले. मुरुड तालुक्यात शिमगा (होळी) सणाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळते.
पाली/वाघोशी | रायगड जिल्ह्यातील होळी सण या वर्षी सामाजिक व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमुळे तसेच दानशूर नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या माध्यमातून शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमातील गरजूंना वाटण्यात आल्या.
माणगाव | सणासुदी कोकणात परतणार्या चाकरमान्यांना पुन्हा एका वाहतुकीचा सामना करावा लागला. माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगा, उन्हात अडकलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची होणारी परवडयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना उसळली आहे.
पोलादपूर | कशेडी बोगद्याजवळ एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अलिबाग | कोकणात शिमगोत्सव सुरु आहे. यानिमित्ताने विविध लोककला, पारंपारिक नृत्य आणि पालखी सोहळेही उत्साहात सुरू आहेत. चाकरमानी गावाकडे आलेल्या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा उत्सव रंगपंचमीपर्यंत सुरू राहणार आहे.
नवी मुंबई | मध्यपूर्वेतील आखाती देशांतील तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर झाला आहे. दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद झाल्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात थांबली असून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले १५० हून अधिक कंटेनर अडकले आहेत.
पनवेल | नवी मुंबई पोलिसांनी तब्बल १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६६ रुपयांच्या किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले. हे अंमली पदार्थ ५५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते. तळोजा येथील शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
पेण | थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी पेण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवत सुमारे १५ टन कचरा गोळा केला. या उपक्रमात तालुक्यातील १५ बैठकांमधील एकूण ९७० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नवी मुंबई | नवी मुंबईतील नागरिकांचे हक्काचे घर मिळवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेसाठी पर्याय निवडीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. आधी १६,८७६ घरांच्या योजनेसाठी पर्याय निवडीची अंतिम तारीख वाढवून आता १९ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.
मुंबई | जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. २० मार्चपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवड करून बैठक घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. जिल्हाधिकार्यांना यासंबंधीचे पत्र देण्यात आलेले आहे.
अलिबाग । रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. दोन पक्षांमधील हा राजकीय सामना ‘टाय’ झाल्याचे दिसत आहे.
अलिबाग | डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे रविवारी (दि. १ मार्च) स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. या उपक्रमात एकूण ३७.५ टन कचरा गोळा करण्यात आला आणि २,४७६ स्वयंसेवक सहभागी झाले.
मुरुड । मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांना ‘आचारसंहितेचा भंग व शासकीय पदाचा गैरवापर’ केल्याबाबत निवडणूक अधिकार्यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आराधना दांडेकर यांनी शासकीय दालनातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केल्याची तक्रार शिवसेना गटनेते पांडूरंग आरेकर यांनी केली होती.
माणगाव | कोकणातील शिमगोत्सवाला यंदा उत्साहाची नवी उधळण लाभली असून गावोगावी लोककला सादर करणारे खेळे दाखल झाले आहेत. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि रंगीबेरंगी मिरवणुकीतून शिमगोत्सवाची रंगत अधिकच खुलते आहे. मनोरंजनासोबतच संस्कृतीचे जतन व संवर्धन करणार्या या लोककलेतून समाजजागृतीचे प्रभावी संदेश दिले जात आहेत.
रोहा । रोहा तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्या आढळल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सातत्याने व्हायरल होत आहेत. कधी एका जंगलात तर कधी दुसर्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्र किनारी भलेमोठे ग्रीन सी टर्टल चिखलात अडकून पडल्याचे आढळून आले. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रथमच अशाप्रकारचा नर ग्रीन सी कासव आढळला असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली.
दिघी । माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन या महत्त्वाच्या मार्गावरील स्थानिक एसटी बस वेळेवर न लागल्याने शुक्रवारी माणगाव एसटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. सकाळी 10.30 वाजल्यापासून तब्बल तीन तास एकही बस न सोडल्याने शेकडो प्रवासी स्थानकात अडकून पडले.
म्हसळा । तळा तालुक्यातील मजगाव येथे पोलिसांनी गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने बांधलेल्या एका बैलाची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश जातीचा एक बैल खरेदी करून कत्तलीसाठी आणला होता. या बैलाला अत्यंत क्रूरतेने वागणूक देण्यात आली होती.
म्हसळा । महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त ‘पोलीस रायझिंग डे’ म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासोबतच अत्याधुनिक शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात आले.
पेण | बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. "कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकर्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
पनवेल | पनवेल महानगरपालिकेत रस्ते बांधणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची बाब लक्षात घेऊन ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गट रायगड उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे ही मागणी केली.
पनवेल | पनवेल लेनवर कोन बिट पोलीस चौकी समोरून जाणार्या ट्रेलरला समोरून स्कुटी चालकाने ठोकर दिल्याने स्कुटीवरीळ दोघांचा मृत्यू झाला आहे.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
कर्जत | रायगड जिल्हा परिषदेचे निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. या पाच सदस्यांनी आपला गट नेते म्हणून कर्जत तालुक्यातील कडाव गटामधून निवडून आलेले मारुती तथा बाबू घारे यांची निवड केली आहे. या पक्षाकडून आपली गटाची निवड रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली.
कर्जत । तालुक्यातील कर्जतनेरळ राज्यमार्गावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या राबीया बकरी फार्ममध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत सुमारे 400 बकर्या तसेच 350 कबुतरे होरपळून मृत्युमुखी पडली, तर फार्म मालकाचे अंदाजे दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
खोपोली/पाली/बेणसे । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाली बाजारपेठेसह सुधागड तालुक्यात ककडीत बंद पाळण्यात आला. खालापूर तालुक्यात, खोपोली शहरातही शोककळा पसरली असून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
खोपोली । खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येतील संशयित असलेले राष्ट्रवादीचे स्थानिक प्रवक्ते भरत भगत 23 दिवसांनंतर अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. काळोखे यांच्या हत्येनंतर ते बेपत्ता होते. पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे काळोखे हत्याप्रकरणातील तपासाची आणखी एक कडी जोडली जाणार आहे.
उरण । उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड शहरातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने येथील रहिवाशांना तब्बल दोन दिवस अंधारात चाचपडत रहावे लागले. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उरण । तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायत हद्दीतील खालच्या आळीतील अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायत निधीतून सुमारे 2 लाख 90 हजार रुपये खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
महाड | महाड औद्योगिक क्षेत्रातील एम्बायो लि. या कंपनीत गुरुवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी रासायनिक प्रक्रीयेचे काम सुरु असताना आग लागली. मात्र तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. एका महिन्यात या कंपनीत लागलेली ही दुसरी आग असल्याने आजुबाजूस असणार्या गावातील ग्रामस्थ कंपनी गेटच्या बाहेर जमा झाले होते.
महाड । महाड तालुक्यातील किल्ले रायगडकडे जाणार्या मुख्य मार्गावरील नातेखिंड येथे दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगर फोडण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अरुंद व धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत होते.
पोलादपूर । आंबेनळी घाटात वळणदार व तीव्र उताराच्या ठिकाणी टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील दहा वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
नागपूर | राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शुक्रवारी (१२ डिसेंबर) विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.