अलिबाग | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. वित्तीय समावेशन, ग्रामीण भागातील बँकिंग सेवांचा विस्तार, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, आधुनिक बँकिंग व्यवस्था आणि सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धी या क्षेत्रांत बँकेने केलेल्या कामाची दखल घेत अधिकार्यांनी बँकेचे कौतुक केले.
पनवेल | इस्रायलमध्ये निधन झालेल्या दोन शेतकर्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावरील करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील जागतिक आदिवासी दिनाच्या मुख्य कार्यक्रमात कर्जतखालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेदांची पार्श्वभूमी असताना आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात त्यांची एकत्रित उपस्थिती लक्षवेधी ठरली.
उरण | ‘तिसरी मुंबई’च्या नावाखाली उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांतील १२४ गावांमधील शेतकर्यांच्या जमिनी तसेच गावांचे अस्तित्व धोक्यात आणले जात असल्याचा आरोप करीत एमएमआरडीए-केएससी नवनगरविरोधी समिती, रायगड यांच्यावतीने येत्या १५ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील कोकण आयुक्त कार्यालयावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
माणगाव | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडण्यामागे कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्याचे सांगितले होते. केंद्रीय मंत्रीच जर कोकणातील रस्त्याबाबत असे म्हणत असतील त, हे ठेकेदार कोणामुळे कंटाळून गेले? असा प्रश्न नाही का निर्माण होत, असा सवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
अलिबाग | नैसर्गिक आपत्ती,अपघात, रोगराई किंवा सर्पदंशामुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास पशुपालकांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राज्यात पशुधन विमा योजना राबवण्यात येत आहे. रायगड जिल्हयात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पनवेल | पनवेलच्या नागरी विस्ताराला गती देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सन २०२६- २७ च्या तब्बल ५ हजार ४२ कोटी ९० लाख ७७ हजार रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पाला शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पनवेल | रिमांडसाठी आणलेल्या आरोपीने पनवेल न्यायालयाच्या आवारातच पोलीस हवालदारावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदीक अख्तर मोहम्मद खान (रा. कल्याण रोड) याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
पनवेल । आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक, न्यायालयीन निर्देशांनुसार तसेच नागरिकांच्या दृष्टीने सुरक्षित व सुव्यवस्थित पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेतर्फे सोमवारी (3 ऑगस्ट) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मूर्तिकार, मूर्ती विक्रेते, स्वयंसेवी संस्था व पर्यावरण क्षेत्रातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
खोपोली । खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ठाण्यातील चार मित्रांपैकी एका तरुणाचा निसरड्या ठिकाणी पाय घसरून सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी घडली.
कोर्लई । कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येणार्या कृषी संलग्न प्रात्यक्षिक कार्यक्रमाअंतर्गत मुरुड तालुक्यातील 25 शेतकर्यांना रोहु, कटला आणि सायप्रिन या जातींच्या मत्स्यबीजांचे वितरण करण्यात आले.
कोर्लई | मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पाच सदस्यांना निवडणूक खर्चाचा हिशेब विहित मुदतीत सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, रायगड यांनी अपात्र (निरर्ह) ठरविले आहे. या सदस्यांना पुढील पाच वर्षे कोणतेही सदस्यपद धारण करता येणार नाही.
माणगाव | माणगाव तालुक्यातील कुंभे केळगण घाट, कुंभे धरण आणि कुंभे बोगदा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
रोहा | रोहा-अष्टमी नगरपरिषदेत प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेतील एका लाभार्थ्याला वापर परवाना देण्यास विलंबावरुन नगरसेवक महेश कोलाटकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला. यावेळी झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
रोहा | मुसळधार पावसामुळे आणि भिरा जलविद्युत प्रकल्पातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे रोहा-अष्टमी शहर पुराच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल तीन वेळा पुराचे पाणी शहरात व नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यकाला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी (४ ऑगस्ट) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. घनश्याम कोमटवार (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
श्रीवर्धन | राज्यात महावितरणकडून सुरु असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोध दर्शवत श्रीवर्धनमध्ये शेकापने तहसीलदार तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन दिले आले. स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक ठेवावे, ग्राहकांवरील सक्ती थांबवावी आणि वाढीव वीजबिले माफ करावीत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
म्हसळा | म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाने अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीने जल्लोष केला. मात्र आठ दिवसांपूर्वी फटाके फोडणार्या शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे.
म्हसळा | म्हसळा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी चार दिवस नगराध्यक्ष राहिल्यानंतर शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून १ जून रोजी मतदान आणि निकाल होणार आहे.
पेण | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह चौघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून फिर्यादी यांना जबर मारहाण करणे, धमकावणे आणि शस्त्र रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पेण | गेल्या महिन्यापर्यंत गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करणार्या नागरिकांना बुधवारी एक वेगळेच दृश्य पहायला मिळाले. पातळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीच्या प्रवाहात हजारो एलपीजी गॅस सिलेंडर वाहत येत असल्याचे दिसताच महापुराची भीती विसरुन अनेकांनी ते पकडण्यासाठी नदीत उड्या मारल्या, तर काही जण होड्यांच्या सहाय्याने सिलेंडर गोळा करताना दिसले.
सुधागड-पाली । पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर परिसरात सोमवारी (3 ऑगस्ट) सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे सलग पाच विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
बेणसे | मासेमारी बंदीच्या काळात मच्छिमारांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. विशेषतः १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या मासेमारी बंदी कालावधीत मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
कर्जत । गेल्या तब्बल 12 वर्षांपासून बंद असलेली नेरळ-वाकस-कशेळे एसटी बससेवा अखेर सोमवार, दि. 3 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसह शेतकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांची दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, या मार्गावर दररोज आठ फेर्या धावणार असल्याने परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.
उरण | उरण तालुक्यात महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका बसत आहे.
महाड | गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खाडीपट्ट्यातील नद्या, खाड्या आणि तलावांमध्ये आलेल्या पुराचा परिणाम आता दिसून येत असून, महाड तालुक्यातील चिंभावे मोहल्ला गावाच्या प्रवेशद्वाराजवळील तलावात दोन मोठ्या मगरींचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड । महाड शहरातील सामाजिक कार्यासाठी ओळख असलेल्या बाल मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एसटी स्मार्टकार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
मुंबई | मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश आहे. नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे.
मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ठाणे जिल्ह्यातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकार्यांच्या नियुक्तीबाबत ‘मातोश्री’वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजी उफाळून आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांच्या पदाधिकार्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.
नवी मुंबई । नागरी सुविधांच्या पूर्तीसोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिले.