मुंबई । राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार व कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.
अलिबाग । असे म्हणतात, पराभव आधी मनात होतो, नंतर मैदानात... रायगडात असेच काहीसे चित्र आहे. सात वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत सत्तेत होते त्यांनी या निवडणुकीआधीच अवसान गाळले की काय? असा प्रश्न पडावा, याचे कारण शिवसेना शिंदे गट आणि भाजप वगळता जिल्ह्यातील अन्य राजकीय पक्ष ‘शिवतीर्था’वर एकहाती सत्ता मिळवण्याच्या तयारीने उतरल्याचे दिसत नाही.
पनवेल । पनवेल न्यायालयातील एका कोर्टरूममध्ये राजेश परदेशी या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. न्यायालयीन कामकाजादरम्यान त्याने बाटलीत आणलेले फिनेलसदृश्य द्रव्य प्राशन केल्याचे निदर्शनास आले. प्रकृती बिघडताच त्याला तत्काळ पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पनवेल । पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (30 जानेवारी) एका अनियंत्रित इको कारमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एका पादचार्याचा जागीच मृत्यू झाला असून, एका रिक्षाचालकाला दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
महाड । महाड तालुक्यातील किल्ले रायगडकडे जाणार्या मुख्य मार्गावरील नातेखिंड येथे दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगर फोडण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अरुंद व धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत होते.
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाणार आहे.
मुंबई । अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. आज शनिवार, दि. 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक दुपारी 2 वाजता विधिमंडळातील सभागृहात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.
कर्जत । तालुक्यातील कर्जतनेरळ राज्यमार्गावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या राबीया बकरी फार्ममध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत सुमारे 400 बकर्या तसेच 350 कबुतरे होरपळून मृत्युमुखी पडली, तर फार्म मालकाचे अंदाजे दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नेरळ/कर्जत । नेरळ, कर्जत व खालापूर परिसरात रात्रीच्या अंधारात विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणार्या टोळीवर नेरळ पोलिसांनी थेट मुंब्य्रात जाऊन धडक कारवाई केली. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणाचा छडा लावत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
अलिबाग | ‘दहा मिनिटांत घरपोच डिलिव्हरी किंवा झटपट सामान पोहचवण्याचा दावा करणार्या कंपन्यांना पनवेल आरटीओने बे्रक लगावला आहे. झेप्टो, ब्लिंकीट, स्विगी, झोमॅटो, इन्स्टामार्ट, बिग बास्केटसह दहा कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. झटपटच्या नादात, डिलिव्हरी करणारे आणि नागरिकांचा दोघांचेही प्रवास धोक्यात येत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अलिबाग । रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. दोन पक्षांमधील हा राजकीय सामना ‘टाय’ झाल्याचे दिसत आहे.
अलिबाग । भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यासाठी ग्रामपंचायत वाडगांवच्या सरपंच सारिका गणेश पवार यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणामुळे वाडगांव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुरुड-जंजिरा । काशिद ग्रामपंचायत सरपंच संतोष जयराम राणे यांचे पद अबाधित राहणार आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी आणि न्यायालयीन निकालांचा अभ्यास केल्यानंतर, कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी रायगड यांचा निर्णय रद्द केला आहे. संतोष राणे यांच्यावर शासनाची जागा विकल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुरुड-जंजिरा । नाताळ नाताळ व वर्षाअखेरीच्या सुट्यांच्या पोर्शभूमीवर मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव तसेच ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. मुरुडसह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदी पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माणगाव | ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीतील अतिशय अवघड आणि अपघातप्रवण वळणावर शुक्रवारी (२ जानेवारी) दुपारी साडेअकराच्या सुमारास पर्यटकांच्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एकूण ५० प्रवाशांपैकी २७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, उर्वरित २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
माणगाव । माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागात उभ्या असलेल्या जुन्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारती आज अक्षरशः अखेरच्या अवस्थेत पोहोचल्या आहेत. एकेकाळी प्रशासनाच्या गजबजाटाने गजबजलेल्या या इमारती सध्या ओसाड, जीर्ण आणि भयावह स्थितीत असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची उघडउघड उधळपट्टी होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
रोहा । रोहा तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्या आढळल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सातत्याने व्हायरल होत आहेत. कधी एका जंगलात तर कधी दुसर्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्र किनारी भलेमोठे ग्रीन सी टर्टल चिखलात अडकून पडल्याचे आढळून आले. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रथमच अशाप्रकारचा नर ग्रीन सी कासव आढळला असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली.
दिघी । माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन या महत्त्वाच्या मार्गावरील स्थानिक एसटी बस वेळेवर न लागल्याने शुक्रवारी माणगाव एसटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. सकाळी 10.30 वाजल्यापासून तब्बल तीन तास एकही बस न सोडल्याने शेकडो प्रवासी स्थानकात अडकून पडले.
म्हसळा । महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त ‘पोलीस रायझिंग डे’ म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासोबतच अत्याधुनिक शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात आले.
म्हसळा । उपचारांमध्ये गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय अलिबाग (रायगड) येथील तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पेण । पेण वाशी नाका येथे एका सिलेंडर टेम्पोला अचानक आग आग लागली. टेम्पोत सिलेंडर असल्याने आगीने आणखी भडका घेतला.आग लागल्याचे दिसताच नागरिक भयभीत झाले आणि सैरावैरा पळू लागले.
पेण । पेण नगरपरिषदेच्या इनडोर गेम हॉलमध्ये सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या पंचधातू साहित्याची चोरी केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे 1 लाख 21 हजार 900 रुपये किमतीच्या ब्रास (पितळ) वस्तूंची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
खोपोली/पाली/बेणसे । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाली बाजारपेठेसह सुधागड तालुक्यात ककडीत बंद पाळण्यात आला. खालापूर तालुक्यात, खोपोली शहरातही शोककळा पसरली असून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
खोपोली । खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येतील संशयित असलेले राष्ट्रवादीचे स्थानिक प्रवक्ते भरत भगत 23 दिवसांनंतर अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. काळोखे यांच्या हत्येनंतर ते बेपत्ता होते. पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे काळोखे हत्याप्रकरणातील तपासाची आणखी एक कडी जोडली जाणार आहे.
उरण । उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड शहरातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने येथील रहिवाशांना तब्बल दोन दिवस अंधारात चाचपडत रहावे लागले. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उरण । तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायत हद्दीतील खालच्या आळीतील अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायत निधीतून सुमारे 2 लाख 90 हजार रुपये खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
महाड । नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलासह इतर आरोपींना अटक करण्यात सरकारला आलेल्या अपयशावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि भरत गोगावलेंकडून निर्देश घ्या, अशा सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
पोलादपूर । आंबेनळी घाटात वळणदार व तीव्र उताराच्या ठिकाणी टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील दहा वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले.
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
नागपूर | राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शुक्रवारी (१२ डिसेंबर) विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे.
नागपूर | राज्याच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटातील १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. तथापि, कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कृपाल तुमाने यांनी कमी दरात वाळू उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.