पालीच्या शुद्ध पाणी योजनेचा राजकारण्यांना विसर , अंबा नदीला प्रदूषणाचा विळखा नागरिक

भाविकांसह मुक्या जीवांचे आरोग्य धोयात

By Raigad Times    07-Jan-2025
Total Views |
pali
 
पाली/बेणसे | पालीच्या शुद्ध पाणी योजनेचा राजकारण्यांना विसर पडला आहे. शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे लाल फितीत अडकून पडली आहे. त्यामुळे विकत घेतलेल्या पाण्यावर महिलांची काटकसर सुरू आहे. आरोग्याच्या दृष्टीने फिल्टर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
 
सुधागड तालुयासह खालापूर, रोहा व पेण आदी तालुयातून वाहणारी व अनेकांची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीतून पाली शहराला पाणी पुरवठा होतो. अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणीदेखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. मात्र सद्यस्थितीत या नदीला प्रदूषणाचा विळखा पडला असून, निर्माल्य, पिशव्या, कचरा, शेवाळ व केमिकलमुळे पाणी दूषित झाले आहे.
 
शेवाळ व रसायनामुळे हिरवट व लालसर तवंग आला आहे. त्यामुळे तालुयातील नागरिक, भाविक व प्राण्यांचे आरोग्य धोयात आले आहे. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदीचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. रासायनिक कपंनीमधुन टाकऊ रसायन हे थेट आंबा नदीत सोडले जाते.
 
तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण साचते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंधी येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेतात.
शुद्ध पाणी योजनेचा विसर
पाली शुद्ध पाणी योजना ही १९७४ साली मंजूर झाली आहे. सद्यस्थितीत तिचा एकूण खर्च आता २७ कोटींवर गेला आहे. मात्र ही २७ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली आहे.
 
राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय बाबी यामध्ये ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजुनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करू असे ओशासन देतात. मात्र अजून काहीच झालेले नाही.
 
प्रशासन व राजकारण्यांना पालीकरांचे हाल दिसत नाहीत. केवळ निवडणुकीपुरते ओशासन दिले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
अंबा नदी जॅकवेलजवळ
असलेला कचरा ताबडतोब काढून घेण्यात येईल. शुद्ध पाणी योजना लवकरात लवकर यावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे. नागरिकांनीही नदीचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाणी उकळून व गाळून प्यावे. कंपन्यांनी आपले रसायन मिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडू नये. -प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली
सुधागड तालुयातील पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कानसळ, हेदवली, जांभूळपाडा आदी गावाजवळच अंबा नदीच्या काठावर अनेक रासायनिक व इतर कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. यातील काही कंपन्यातील दुषित रसायनयुक्त पाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. यामुळे तालुयातील अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या लोकांचे जनजीवन धोयात आले आहे. दुषित पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने लोक, जनावरे यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा काही कंपन्यांवर प्रदूषण नियामक मंडळाने याबाबत योग्य कारवाई करावी. -केतन म्हसके, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र, रा. वावे - सुधागड